शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... प्रीपेड जेल वारी

पण काहीही म्हणा...
प्रीपेड जेल वारी

कुतुहल न् धाडसापोटी माणुस
माहित नाही काय करील?
पाचशे रूपये भरून हौसेने
मस्त टुरीस्ट जेलमधे जाईल !

मध्यवर्ती कारागृहाचेे संग्रहालय
संगरेड्डी जिल्हयात झाले,
पैसे भरून टुरीस्ट बघा आता
जेलची हवा खावु लागले !

© शिवाजी सांगळे 🎭

तेलंगणा सरकारने मेडक येथील संगरेड्डी जिल्हयाच्या मध्यवर्ती कारागृहाचे संग्रहालयात रूपांतर करून "फील दी जेल"ची अभिनव संकल्पना सुरू केली आहे.

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25569/new/#new

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... वायफाय कटींग


पण काहीही म्हणा...
वायफाय कटींग

जमाना पुरता हल्लीचा
इंटरनेटमय झाला आहे,
कुठे माँल न् स्टेशनवर
वायफायचा ताल आहे !

सत्कार चहावाल्यानं यात
चांगलच डोकं लढवलं,
चहासंगे वायफाय देतांना
शेगावचं नावही वाढवलं!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25560/new/#new

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

शृंगार आसवांचा

शृंगार आसवांचा

डोळ्यात ओल्या आसवांचा
शृंगार पाहिला मी
ओठातच दाबल्या वेदनेचा
हुंदका ऐकला मी

मरता रोज तो जीव एक
श्वासात जो गुंतलेला
एकांती निश्वास घेत
पहुडलेला पाहीला मी

उसवल्या ओठाच्या किनारी
लेप लाळेचा दाटलेला
घाव जिरलेल्या जखमेचा
शरीरावर पाहिला मी

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25559/new/#new

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

पायऱ्या

पायऱ्या

ढासळलेलं, तुटलेलं छप्पर पाहून
मन निराश झालं होतं ...
किती आठवणी, स्वप्ने... विखरून गेली,
उतरवली गेली भिंतीवरून !

दोरी, भोवरा, खुपश्या गोट्या,
पतंगाच्या त्या रंगीत शेपट्या ,
ज्या राहून गेल्या होत्या चिटकविण्याच्या...
खजिना, खोक्यात...
फक्त एवढाच होता माझ्या जवळ...!

कोपऱ्यातील खिडकी
तोडली नव्हती अजुन, जीथे
स्ट्रीट लाईटच्या उजेडात...
रात्रीत बसायचो कधी...
पुस्तक घेऊन अभ्यास करीत !

अभ्यास करता करता...
विविध भारती ऐकायचो, तो
ट्रांजिस्टर सुद्धा हरवलाय कुठेतरी!
माणुसकी सारखा...!

बाल्कनी अर्धवटच तुटलेली
कदाचित, माझ्या भूतकाळाला शोधत,
कोणाची नजर गुंतलेली तिच्यावर?
शेजारच्या ईमारतीतुन ...!

भितींचा तो तुटलेला सारा ढिगारा
कित्येकांची स्वप्ने दडपुन गेला,
स्वप्ने, ओरडून बोलावित असतील!
त्यातुन...
पण कुणाला ऐकू येतात?

रात्रीत... भीतीदायक वाटतात,
पायऱ्या, त्या तुटलेल्या जिन्याच्या
हुंदके देत असतात...
पावलांच्या चाहुलीं साठी...!

आपल्या जाणिवा वाढु लागल्या,
नव्या नव्या तंत्रज्ञाना सोबत?
ती ओढ, तो ओलावा.
उब, आर्द्रता... नात्यातील...
विरून गेली...  कदाचित?

ऐकलंय...
टाँवर होणार आहे येथे,
हाय फाय, वाय फाय !
मग कोण कुणाशी बोलणार?
लिफ्ट येणार, तेव्हां
कोण चालणार पायऱ्यांवर?

© शिवाजी सींगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25522/new/#new

दे धक्का...! जगणं समानतेचं


दे धक्का...!
जगणं समानतेचं

होवु पहातोय रे महासत्ता
स्वातंत्र्याची सत्तरी येतांना,
तरीही तोडू शकलो नाही
आम्ही जातीधर्मांच्या बंधना !

शक्तीप्रदर्शने होतात नित्य
आरक्षाणाच्या ध्येय्या साठी,
वेळ आली आहे मित्र...हो
सर्व समानतेने जगण्या साठी!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25507/new/#new

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! विकृत पशु


दे धक्का...!
विकृत पशु

पुन्हा एकदा राजधानी
नव्या घटनेने हादरली,
आणखी एक तरूणी
जीवानिशी फुका गेली !

कुठे चाललाय समाज?कि
संस्कारच ते खोटे झाले?
कसे असे, हे विकृत पशु
माते उदरी जन्मा आले !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25497/new/#new

दे धक्का...! औकात


दे धक्का...!
औकात

हल्ली तर अतिरेकी हल्ले
देशात होतात का हो थोडे?
तरी आम्ही उधळत असतो
अंतर्गत आरक्षणाचे घोडे !

गरज तशी आता एकजुटीत
खंबिरतेने राहण्याचीे आहे,
शेजार्‍याल्या त्याची औकात
दाखवण्यात खरा दम आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25489/new/#new

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! उर बडवे


दे धक्का...!
उर बडवे

कित्तेक आजवर शहीद झाले
तेंव्हा न आला कधी भरून उर?
मरता कधी एखाद आतंकवादी
लागतात येथले बडवायला उर !

बुध्दिजीवी हाे तोंडास तूमच्या
का लावला आता तूम्ही टाळा?
आतंकवाद्यांनी आणला जेंव्हा
काश्मिरीं लोकांच्या पोटी गोळा!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25479/new/#new

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! तू रे माणसा


दे धक्का...!
तू रे माणसा

चमत्कारा असतो नमस्कार
खुर्चीची असते माया सारी,
कुणीही असो मग खुर्चीमधे
खुर्चीमागे दौड लागते दारी !

उगवत्या असे इथे नमस्कार
मावळत्या मग कोण विचारी?
असता सत्ताधिकारी माणसा
मनास प्रश्न तु, का न विचारी !

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25468/new/#new

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! नंबर दोन


दे धक्का...!
नंबर दोन

उपराजधानीतच आताशा
गुन्हेगारी फार वाढत आहे,
पोलिसांवर हल्ले करणारे
जेलमधुन पसार होत आहे !

या स्पर्धेत सुध्दा आता
राज्य अग्रेसर होत आहे,
एनसीआरबी मता नुसार*
यु.पी. नंतर महाराष्ट्र आहे!

*नँशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरो

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25436/new/#new

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

जगण्याचा फंडा

जगण्याचा फंडा

काही हसून बोलायचं
काही बोलून हसायचं
जीवन असचं आहे
हसता हसता रडायचं
न् रडतांना हसायचं...!

जगण्याचे कष्ट तर
सगळ्यांनाच आहेत,
मित्रा, कष्टाला डिवचुन
मजेत हसत खेळायचं...!

जोकरला विचारून बघ
असं कस जमवायचं?
दुःखात सुध्दा हसायचं
हसता हसता रडायचं...!

हसुन नाही जमल
तर रूसुन बोलायचं
आपल्या लोकांचे
अश्रु पुसत बोलायचं...!

जगण्याचा फंडा
तसा सोपा आहे यार
दुसर्‍यांच्या मनात
घर करून रहायचं...!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t25408/new/#new

दे धक्का...! "अच्छे दिन"ची हड्डी


दे धक्का...!
"अच्छे दिन"ची हड्डी

"अच्छे दिन" चा नारा म्हणे
सर्वात आधी काँग्रेसने दिला,
आम्ही केवळ घोषणा देताच
हड्डीचा घास गळयात गुंतला!

अतृप्त आत्म्यांच्या या देशात
"अच्छे दिन" कधी येणार?
कायम प्रश्न घेवुन मनात हा
गडकरी आता कुठे फिरणार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-'-'-25421/new/#new

बाप्पा रे...!


बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

टूर टु ग्वालियर...एक प्रवास

टूर टु ग्वालियर...एक प्रवास

!! गणपती बप्पा मोरया !!

     तीस वर्षात प्रथमच गणपती उत्सवात काहि विशेष निमित्ताने ग्वालियर (म.प्र.) येथे सासुरवाडीला येण्याचा योग आला, ज्या कामासाठी आलो ते काम सुखकर्ता दु:ख हर्ता गणपती बाप्पा सुखरूप पार पाडील अशी आशा करतो. 

     ग्वालियर, (म.प्र.) येथे खास करून सर्वच मराठी कुटुंबात पुणेरी विशेषत: पेशवे परंपरेचा पगडा जाणवतो, तस तर या शहराला एैतिहासिक संदर्भ व परंपरा आहेतच. लहान लहान रस्ते, गल्ल्या असलेल्या शहरात प्रत्येक नाक्यावर, गल्लीच्या कोपर्‍यांवर शक्तीदेवता हनुमानाची मंदिरेे जागोजगी दिसतात, या व्यतिरिक्त इतर अन्य देव देवतांची सुध्दा खुप मंदिरे आहेत, त्यामुळे इथे सतत उत्सवाचे वातावरण असते. 

     इथल्या मराठी लोकांमध्ये सण उत्सव साजरे करण्यात व विशेष करून खाद्द संस्कृतीत पुणेरी प्रभाव जास्त जाणवतो. ऐतिहासिक वारसा असलेलं शहर असल्यामुळे आजही येथे जुन्या परंपराची जपणुक केली जात आहे, पिढी बदलानुसार आधुनिकते कडे झुकत चाललेलं शहर अशी ओळख होवु लागली आहे. नविन नविन गृह प्रकल्प येवु लागल्या मुळे शहरात आता मल्टीस्टोरेज ईमारतींचे निर्माण होत असल्यामुळे एक नवेच वेगळे रूप शहर घेवु लागले आहे. इथे प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते, या सोबत अचलेश्वर नामक प्रसिध्द विभागात एका पुरातन स्वयंभु शिवमंदिरा समोर गेल्या पन्नास एक वर्षाची परंपरा असलेल्या गणेश मंडळाकडून सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याची परंपरा या शहरात सुरू केली असे चौकशीत समजले. 

    गणपती उत्सवानंतर इथे दुर्गा उत्सव व दिवाळी फार जोरदार साजरी केली जाते, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या अठरापगड सामजाच्या अनेकविध परंपरेनुसार साजरे केले जाणारे बरेच सण, उत्सव वर्षभर सुरू असतात. बाकि व्यापारी वर्ग फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फार मोठी उलाढाल येथे चालते. इतर शहरांप्रमाणे इथे सुध्दा शहराचा विस्तार होउ लागलाय, जुने व नवे असे दोन भाग स्पष्ट दिसतात. एकंदरीत एकदातरी भेट देण्याजोगे शहर आहे, आजुबाजुला फारच सुंदर ऐतिहासिक परंपराची अन्य शहरे आहेत जसे शिवपुरी, मथुरा, आग्रा, खजुराहो वगैरे. बर्‍याच वर्षां पासुन या शहराबद्ल काहितरी लिहावं असं मनात होतं तो योग आता आला एवढंच.

      खरं तर इथे आलो होतो ते काही वेगळ्याच कामासाठी, परंतु ते कार्य परमेश्वर कृपेने व्यवस्थित पार पडले. या प्रकारे प्रवास 
वर्णनात्मक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, कही चुकलं असेल तर सर्व वाचक सहकारी सांभाळुन घेतील हि अपेक्षा.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25418/new/#new

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1091497450904906&id=100001339833771

दे धक्का...! काळाचे बाबा


दे धक्का...!
काळाचे बाबा

कित्येक काळा पासुन हे बाबा
नेहमी प्रचारात सांगत असतात,
परदेशी मालास टक्कर देत
स्वदेशीचा जम बसवु पाहतात !

योगा सह उपभोगाची साधने
बाबा आता निर्माण करू लागले,
खान्यापिण्याच्या वस्तुं सोबत
हल्ली कपडे सुध्दा शिवू लागले !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25403/new/#new

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! टँक्स पेट्या


दे धक्का...!
टँक्स पेट्या

इन्कम टँक्स चुकवायला
लोक वेगवेगळे मार्ग शोधतात,
तेच लोक देवाच्या पेटीत
डाँलर व दागिने गुपचुप सोडतात!

यापुढे इन्कम टँक्स ऐवजी
सरकारने धार्मिक टँक्स घ्यावा,
टँक्स रिटर्न फाँर्म ऐवजी
दरवर्षी दानपेटयांचा कँप्म लावावा !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25402/new/#new

सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! कार्यकर्ते

दे धक्का...!    
कार्यकर्ते

राजा पेक्षा आजकाल
कार्यकर्ते आहेत जोमात,
दरवर्षी दादागीरी आता
होउ लागली मंडपात!

भाविकांची सारी भक्ती
रांगेतच पेंगाळु लागते,
वशिल्यांच्या भक्तांसाठी
आपसातच जुंपुन जाते!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25387/new/#new

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! दारू बंदी


दे धक्का...!
दारू बंदी

वैध काय अवैध काय?
दारू ती दारूच हाय,
काहीही समजुन प्यायली
तरी, नशा तर देणारच हाय !

बंदी साठी तीच्या आता
नवे पर्याय शोधणार काय?
कशाला उगा फार्स करता?
कारखानेच बंद होत का नाय?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25365/new/#new

दे धक्का...! स्वच्छतेचं सर्वेक्षण


दे धक्का...!
स्वच्छतेचं सर्वेक्षण

स्वच्छतेच्या क्षेत्रात पण आता
महाराष्ट्राने आपला नंबर राखला,
क्यू.सी.आय. च्या सर्वेक्षणात *
सिंधुदुर्गाने पहिला नंबर घेतला!

स्वच्छतेचा फायदा, हा तसा
सर्वांनाच कायम होत असतो,
त्याचेच अभियान राबवले, तर
त्यात अनेकांचा सहभाग हाेतो!

*(क्वालिटी कौन्सिल आँफ इंडिया)

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25357/new/#new

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

रीत

रीत

ओथंबुन बरसायची कधी
मेघ बरसल्या सारखी,
असते भरून आता
मळभ दाटल्या सारखी!

बरेच दिवस वाट पाहतोय,
काही खबर नाही तीची...

         असच काहीसं झालं कि मनात बरेच विचार दंगा करू लागतात, थोडं शांत होताच, मन उगीच कालच्या व आजच्यात तुलना करायला लागतं....

          पुर्वी तश्या सुविधा फार कमी होत्या, तेंव्हा एकमेकास पत्रं पाठवली जायची, अगदिच महत्वाचं वा काही गंभीर बाब असलीच तर ट्रंककाँल करावा लागत असे, नंतर नंबर टेलीफोनचा, तरी कारणापरत्वे कधी तरी फोन करायला मिळायचा, हातातून सुटत नसे फोन बर्‍याचदा तेंव्हा, पण हल्ली चित्र पार पालटलयं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असुन सुध्दा शब्द कमी पडू लागलेत, वेळ म्हटला तर तो तसाच आहे, बारा अधीक बारा तासांची विभागणी केलेला, फक्त आपल्या जाणिवांचेच काटे जास्त फिरू लागलेत असं वाटतं!

          किती सोप व सरळ होतं ना सारं तेंव्हा! बर्‍याच घटना, गोष्टी त्यांचा तात्कालीक उच्चतम व न्युनतम परिणाम होउन गेल्यानंतर कळत असत, तरीही त्यांचे विविध पडसाद तेवढयाच तिव्रतेने उमटत असंत व त्या बद्लच्या प्रतिक्रिया पण तशाच पोहचत असत, किंबहुना त्यावरील प्रतिक्रियांची पलिकडच्या बाजुला प्रतीक्षा होत असायची. आज तर सारंच इंन्स्टट झालयं, टेक्नाँलाँजी मुळे सेकंदात अनेक गोष्टी एकिकडू दुसरीकडे त्यांच्या परिणामां सकट पोहचतात, तरीही त्यातील ओलावा हरवल्यासारखा वाटतो, एक कृत्रीमता जाणवते, कदाचित टेक्नाँलाँजी मुळे प्राप्त झालेल्या एका माहितीवर आपलं मत पक्क होई पर्यंत वेगळ्याच विषयाची दुसरी माहिती प्राप्त होते, दरम्यान अगोदरची माहिती थोडी दुर्लक्षित होते व तीचा प्रभाव पडायचा राहून जातो. माहितीचा ओघ येवढा तीव्र व प्रचंड आहे कि पाच मिनिटा पुर्वी काय पाहिलं वा वाचलं हे सुध्दा लक्षात रहात नाही, आणि तशीच सवय आपण आपल्या मेंदुला पण लावतोय कि काय? असं मला वाटतं.

          पुर्वी घोकंपट्टी करावी लागे, एक एका गोष्टींची कित्तेक पारायणे घडत, मनावर कोरल्या जात त्या गोष्टी, घटना ते प्रसंग लक्षात रहात, माहितीचा ओघ कमी होता म्हणुन कि काय त्याच त्याच गोष्टी चघळल्या जायच्या? पण एक कबुल करायलाच हवं ते म्हणजे घोकंपट्टीमुळे बर्‍याच बाबतीत पाया पक्का होउन जायचा.

          विचार करता टेक्नाँलाँजीचा फायदा तसा खुप होतोय, पण माणुस दुरावतोय, तेच ते छापील मेसेज कट पेस्ट करून पाठवले जातात किंवा घाईगडबडी बोलणं होतं, त्याला पत्राची वा बुथवरच्या काळ्या पिवळ्या फोनवरून उच्चारलेल्या शब्दांची सर नाही येत, एक तकलादूपणा येवु लागलाय, भावनांचा मोहोर नसलेला. मेघदूताची रोमँन्टीक परंपरा असलेल्या आम्हाला सर्व सुविधा असुन कोरडेपणा का जाणवतो? कदाचीत जगण्याची रीतचं बदलत चालली आहे वाटतं आपली...!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25347/new/#new

दे धक्का...! यंदाही समुद्रात


दे धक्का...!
यंदाही समुद्रात

विसर्जनाची तयारी सारी
झालीच असेल ना सर्वांची?
पाण्यात उतरतांना फक्त
काळजी घ्या एकमेकांची !

स्टिंग रे आणि जेली फिश
आलेत यंदाही समुद्रात,
निष्कळजी पणे उतरू नका
उघड्या अंगाने पाण्यात !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25356/new/#new

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

मला वाटते.... रीत

रीत

ओथंबुन बरसायची कधी
मेघ बरसल्या सारखी,
असते भरून आता
मळभ दाटल्या सारखी!

बरेच दिवस वाट पाहतोय,
काही खबर नाही तीची...

असच काहीसं झालं कि मनात बरेच विचार दंगा करू लागतात, थोडं शांत होताच, मन उगीच कालच्या व आजच्यात तुलना करायला लागतं....

पुर्वी तश्या सुविधा फार कमी होत्या, तेंव्हा एकमेकास पत्रं पाठवली जायची, अगदिच महत्वाचं वा काही गंभीर बाब असलीच तर ट्रंककाँल करावा लागत असे, नंतर नंबर टेलीफोनचा, तरी कारणापरत्वे कधी तरी फोन करायला मिळायचा, हातातून सुटत नसे फोन बर्‍याचदा तेंव्हा, पण हल्ली चित्र पार पालटलयं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असुन सुध्दा शब्द कमी पडू लागलेत, वेळ म्हटला तर तो तसाच आहे, बारा अधीक बारा तासांची विभागणी केलेला, फक्त आपल्या जाणिवांचेच काटे जास्त फिरू लागलेत असं वाटतं!

किती सोप व सरळ होतं ना सारं तेंव्हा! बर्‍याच घटना, गोष्टी त्यांचा तात्कालीक उच्चतम व न्युनतम परिणाम होउन गेल्यानंतर कळत असत, तरीही त्यांचे विविध पडसाद तेवढयाच तिव्रतेने उमटत असंत व त्या बद्लच्या प्रतिक्रिया पण तशाच पोहचत असत, किंबहुना त्यावरील प्रतिक्रियांची पलिकडच्या बाजुला प्रतीक्षा होत असायची. आज तर सारंच इंन्स्टट झालयं, टेक्नाँलाँजी मुळे सेकंदात अनेक गोष्टी एकिकडू दुसरीकडे त्यांच्या परिणामां सकट पोहचतात, तरीही त्यातील ओलावा हरवल्यासारखा वाटतो, एक कृत्रीमता जाणवते, कदाचित टेक्नाँलाँजी मुळे प्राप्त झालेल्या एका माहितीवर आपलं मत पक्क होई पर्यंत वेगळ्याच विषयाची दुसरी माहिती प्राप्त होते, दरम्यान अगोदरची माहिती थोडी दुर्लक्षित होते व तीचा प्रभाव पडायचा राहून जातो. माहितीचा ओघ येवढा तीव्र व प्रचंड आहे कि पाच मिनिटा पुर्वी काय पाहिलं वा वाचलं हे सुध्दा लक्षात रहात नाही, आणि तशीच सवय आपण आपल्या मेंदुला पण लावतोय कि काय? असं मला वाटतं.

पुर्वी घोकंपट्टी करावी लागे, एक एका गोष्टींची कित्तेक पारायणे घडत, मनावर कोरल्या जात त्या गोष्टी, घटना ते प्रसंग लक्षात रहात, माहितीचा ओघ कमी होता म्हणुन कि काय त्याच त्याच गोष्टी चघळल्या जायच्या? पण एक कबुल करायलाच हवं ते म्हणजे घोकंपट्टीमुळे बर्‍याच बाबतीत पाया पक्का होउन जायचा.

विचार करता टेक्नाँलाँजीचा फायदा तसा खुप होतोय, पण माणुस दुरावतोय, तेच ते छापील मेसेज कट पेस्ट करून पाठवले जातात किंवा घाईगडबडी बोलणं होतं, त्याला पत्राची वा बुथवरच्या काळ्या पिवळ्या फोनवरून उच्चारलेल्या शब्दांची सर नाही येत, एक तकलादूपणा येवु लागलाय, भावनांचा मोहोर नसलेला. मेघदूताची रोमँन्टीक परंपरा असलेल्या आम्हाला सर्व सुविधा असुन कोरडेपणा का जाणवतो? कदाचीत जगण्याची रीतचं बदलत चालली आहे वाटतं आपली...!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25347/new/#new

दे धक्का...! आत्मपरीक्षण?


दे धक्का...!
आत्मपरीक्षण?

हल्लीच पोलिसांच्या मागे
लोक हातधुवुन का लागले?
परीस्थितीचा विचार करा
कुणाचे, कुठे, काय चुकले?

दोहोंना आता आत्मपरीक्षण
करण्याची नक्की गरज आहे,
दोघांतील राजकिय हस्तक्षेप
खरचं टाळण्याची गरज आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25346/new/#new

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! उपकर


दे धक्का...!
उपकर

अपघात रोखण्यासाठी आता
नविन वाहनांना उपकर लावणार,
लावणार आहात उपकर, तर
अपघातप्रवण रस्ते कोण सुधारणार?

अगोदरच सर्वांकडून रोड टँक्स
बर्‍यापैकि वसूल केला जातो,
बिओटी मधुन रस्ते तयार होतात
मग जमा झलेला कर कुठे जातो?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25313/new/#new

रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! वाँट्सअँप, सं/वाद


दे धक्का...!
वाँट्सअँप, सं/वाद

अभिव्यक्ती स्वातंत्र म्हणजे
कुठेही काहिही लिहायचं,
वाँट्सअँप वापरताना मात्र
थोडसं तारतम्य पाळायचं !

वाँट्सअँपचं लिखाणं आता
भोसकण्या पर्यंत गेलं आहे,
प्रत्येकाने नक्की ठरवा आता
तुम्हाला कुठवर जायचे आहे!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25286/new/#new

येणे जाणे येथवरचे

येणे जाणे येथवरचे

चुकलेच ना कोणा, येणे जाणे येथवरचे
आला कोण मुक्कामी, येथे आराम कराया?

जिर्णत्व जयांचे सत्य, वसनापरी ती नाती
गुंतुनी भावनेत सार्‍या, कष्टतो उगी जगाया !

जो जगतो स्वतः,  तो आपुल्याच साठी
व्यर्थ त्रासतो जीवश्च, दुसर्‍यां प्रेम दावाया!

जाणता एकदाच ते, सत्य सारे जीवनाचे
उमगतो हिशोब मग, बसलोय जो कराया !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t25276/new/#new

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! "जिवो"जी भरके


दे धक्का...!
"जिवो"जी भरके

हम तो जी रहें है मजे में
अब तुम भी जीभरके "जिवो",
साठ दिवसांसाठी फुकट देतो
नंतर पैसे देवुनच वापरा "जिवो"!

"दुनिया मुठ्ठीमें" आधीच होती
केली बघा सेव्हन-जी ची तयारी,
मस्त वापरा तुम्ही आता "जिवो"
घेतो मी धंदा वाढवाया भरारी !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-''-25266/new/#new

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

ओझे श्वासांचे

ओझे श्वासांचे

सुटता मिठी जरा दुश्मनाची
आपलेच तेंव्हा वार करते झाले!

सुटला उसासा जरा वेदनेचा
हसण्या स्वकिय ते गोळा झाले!

झेलता झेलता प्रपात दुःखांचे
दुःखाशीच आता मज प्रेम झाले!

जगावे किती अजुनी जीवना?
अवजड ते ओझे श्वासांचे झाले!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25257/new/#new

दे धक्का...! चँनेल बंदी


दे धक्का...!
चँनेल बंदी

भारतीय चँनल्सना घालणार
आता पाकिस्तानात बंदी,
तरी सुध्दा इथे काहि लोक
त्यां कलाकारांसाठी आनंदी!

संस्कृती अशी एकाबाजूने
कधी रूजवता येतच नाही,
कट्टरतेचा पुरस्कार करणार्‍या
देशात संस्कृती कधी रूजत नाही !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25256/new/#new

प्रवास...


गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! मुंबईचा पुळका


दे धक्का...!
मुंबईचा पुळका

भ्रष्टाचारावर ओरड करणारे
जीएसटीचं श्रेय घेवु लागले,
मुंबईच्या स्वायतत्तेचे डोहाळे
प्रत्येकाला आता लागु लागले?

सोन्याचं अंड देणारी कोंबडी
कुणी आता कशी पाळायची?
त्याच तयारीला लागलेत सारे
ठरवून मुंबई ताब्यात घ्यायची !

© शिवजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25241/new/#new