दुर्दशा
कधी होते, पावसाची प्रतीक्षा
कधी होते, त्याची पण उपेक्षा
तो कोसळो किंवा न कोसळो
गुपचुप बोलणी खातो हमेशा
अतिवृष्टी नाहीतर आहे कोरड
आपल्याच कर्माची, ही शिक्षा
मला वाटतं, आपणच कारण!
संपवून पर्यावरण केली दुर्दशा
करून सवरून नको ते उद्योग
उलट आम्हीच ठेवतोय अपेक्षा
https://marathikavita.co.in/index.php?topic=86485.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९









