घराघरात, खरात जोरात
आंधळं दळतं न् कुत्र पिठ खातंय
खरात मुळेच, हे मात्र स्पष्ट होतंय!
दरम्यान कुणासाठी होतं प्रशासन
कैक अशा प्रश्नांच मोहोळ उठतंय!
सत्तेसाठी हवी आहे आणखी सत्ता
प्रत्येकाचे गाऱ्हाणं, येथे एकासुरात,
असल्याच संधींचा उचलून फायदा
शिरकाव करतो ना,भोंदू घराघरात!
शासकीय उत्तर,चौकशी सुरू आहे!
जबाबदारी सरकारवर टाकणार का?
आरोपी सोबत, मदत करणाऱ्यांना
इमानदारीने शिक्षा ठोठावणार का?
https://marathikavita.co.in/index.php?topic=77974.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

.jpg)






