गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

खुर्ची


हाक अंतरीची

हाक अंतरीची

       अस्तिक नास्तिकतेच्या सीमारेषा कुणी का ओढल्यात? माहित नाही? मी नाही मानत उगीच काही परंपरा. मनात नसता कुणाच्याही पाया पडणं किंवा चार लोक जातात म्हणून त्यांच्या मागे देवळात जाणं मला नाही पटत, भले मग कुणी मला नास्तिक म्हणो. माझ्या बाबतीत खुपदा असं होतं, का ते माहीत नाही. पुर्वी कामानिमित्त दौर्‍यावर जावं लागत असे, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी भटकंती व्हायची, काम संपल्यावर त्या त्या वेळी व ठिकाणानुसार सोबतीचे कधी मंदिर, पार्क किंवा अन्य प्रेक्षणिय व प्रसिध्द स्थळांना भेटी द्यायचा बेत करीत, मलाही आवडायचं, एरवी सर्व ठिकाणी मी जायचा पण मंदिर वा अन्य धार्मिक ठिकाणी मी खुपदा जात नसे, याचं कारण मला आजही सांगता येत नाही परंतु बाकि लोकांच्या मते तेव्हा मी नास्तिक ठरायचो.

       एकदा सोलापूर दौर्‍यावर असतांना सोबत्यांच्या हट्टाखातर श्री सिध्देश्वर मंदिरात पोहचलाे, सुरेख नक्षीकाम केलेलं दगडी हेमाड पंथी बांधकाम, चहुबाजुला बसविलेल्या किंवा कुणी भक्तांनी आणुन ठेवलेल्या वेगवेगळ्या आकारातील अनेक शिवलिंग प्रतिमा फारच विलोभनीय, मंद दरवळणारा कर्पुर, अगरबत्ती व धुपाचा सुगंध सोबत नित्य नविन येणार्‍या भक्तांकडून होणारा घंटानाद खुप छान वातावरण होते, तरीही मी काही तरी वेगळ शोधत होतो. एका विस्तृत अशा दगडी महिरपी असलेल्या सभामंडपात कुणा बाबांचे कानडी भाषेत प्रवचन सुरू होते, आम्हा सर्वांचे दर्शन सोपस्करही उरकले होते, काही काळ बसावं म्हणुन आम्ही तेथे कठड्यावरच बसलो. माझं ध्यान त्या बाबांच्या शब्दांवर, ते मी एकाग्रतेने ऐकत होतो, काय झालं ते समजलं नाही, त्या बाबांची भाषा कळत नव्हतीच परंतु त्यांच्या शब्दांत इतकं माधुर्य होतं कि मी तीथं गोठल्यागत झालो, अर्धातास उलटला, सोबती म्हणु लागले चल निघु, पण मी हललो नाही. काय होतं ते? त्यांते शब्द माधुर्य, वातावरणाचा प्रभाव? कि अंतरीची हाक? आजपावेतो न उमगलेलं कोडं, तसाच अनुभव श्री स्वामी विवेकानंद मेमोरीयल, कन्याकुमारी येथला आरपार भारून टाकणारा.

       परमात्म्याचा अंश कधी नादातून, कधी स्वरातून तर कधी गंधातून जाणवतो, तेंव्हा आत्मा बरोबर तिथे ओढला जातो, मग ठिकाण मंदिर, दर्गा वा चर्च कोणतेही असो, स्वर उमजणारा,समजणारा जरी नसला तरीही तो मनाला भावतो व पर्यायाने आत्म्याला तेथे आेढून नेतो, कदाचित जीवा शिवाची भेट अशीच होत असावी? परम शांततेचा स्वर ॐकार असो किंवा मंदिरातल्या घंटेचा नाद, पहाटे पहाटे कानावर पडणारे अजानचे अविट स्वर नाहीतर चर्चमधे घुमणारा धीर गंभीर चर्चबेलचा आवाज असो, नकळत मनाला शांत करीत असतात, ही स्पंदणं हृदयाशी एकरूप होतात, काही वेळ तरी स्वतःला विसरायला लावतात.

       चौदाएक वर्षांपुर्वी दक्षिण भारतात दौर्‍यावर गेलो होतो, निटसं लक्षात नाही बहुतेक रामेश्वरचा बस स्टँंड असावा, वेळ पहाटे सव्वा ते साडे चारची, डिसेंबरातली बोचरी थंडी, कोपर्‍याला शेकोटी करून ड्रायव्हर, कंडक्टर असे जोडी जोडीने शेकोटीच्या भोवती बसलेले, टेप रेकाँर्डवर कुठलसं दाक्षिंणात्य सुरावटीच भजन सुरू होतं, संगीताच्या त्या सुरांची काय जादू झाली कुणास ठावूक? मी आपसुक त्या शेकोटी कडे वळलो त्यांच्या पाठीमागे शांतपणे ऐकत उभा राहीलो, माहित नाही एक विलक्षण अनुभुती जाणवत होती, भजनातील एकही शब्द समजत वा कळत नव्हता, पण सुरांनी बांधुन ठेवलं होतं मला, कसा मग्न झालो त्यात समजलंच नाही, काही वेळने बरोबरचे लोक विचारू लागले काय झालं? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते, ज्या टोळक्यात उभा होतो ते सुध्दा चक्रावलेलेे, त्यातील एकाने विचारलंच "मल्याली?" मी नकारार्थी मान हलवित म्हटलं "महाराष्ट्र".

       बहुदा असाच असावा आतला नाद, परम्यात्म्याशी नकळत कधी तरी जुळणारा, स्वतःतल्या "स्व" ची ओळख करून देणारा, म्हणुनच असावं कि सुर, स्वर, व नादाला जात धर्म नसतो, प्रांत वा देश नसतो, असतो तो केवळ जीवाशिवाचा ॠणानुबंध न दिसणारा न उमजणारा कुठेतरी निराकार ईश्वराच्या नाळेशी जोडलेला.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26772/new/#new

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

कुर्सी


कुर्सी

कुर्सी... सत्ता की
कुर्सी... अधिकार की
कुर्सी... जेष्ठता की
कर्सी... देवों की
कुर्सी... अध्यात्म की
कर्सी... भक्तों की
कुर्सी... रक्षण की
कुर्सी... आरक्षण की
अब यह न सोचो... कि
सत्ता की कुर्सी या
अन्य कुर्सी के बारे में,
कुछ कहने वाला हूँ?
जी हाँ, ओर एक कुर्सी है,
हमारे बुजुर्गों की...
सोचा है किसी ने?
बैठना चाहेंगे हम कभी
इस कुर्सी में?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/hindi-kavita/t26684/new/#new

गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

हाव सुटता सुटेना

हाव सुटता सुटेना

मी बोलावे तू गप्प व्हावे 
गोष्ट माझी कधी त्वा कळेना
अंतरीचे गुपीत माझ्या
कधीच तूजला ते उमजोना

मला वाटे नित्य नवल
गुंतलो गेलो कसे या बंधना
रोज राडे थोडे थोडे
संपवावे कसे मला कळेना

आस तुमच्या या घराची
सोडू म्हणता कशी ती सुटेना
हाव भुकेल्या या जीवाची
भागवावी म्हणता का भागेना
© शिवाजी सांगळे 

भेट तुझी माझी...

भेट तुझी माझी...

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
एसी युक्त हॉटेल होते गर्दीहि ती लोकांची

प्रखर उजेड नव्हता तेथे, कसलाच न पसारा
आनंदात होते सारे, आनंदची होता सारा
मला मुळी नव्हती चिंता, होणाऱ्या खर्चाची

हाती घेऊन दोन ग्लास, अदबीनं वेटर आला
वाकुनिया कमरेमध्ये, काय आणु असे म्हणाला
लागलीच ऑर्डर दिली, आण प्लेट समोस्याची

केसांमध्ये फुले होती, गालावरी तुझ्या लाली
पाहून रूप तुझे, येई स्मित माझ्या गाली
श्वासालाही ओढ होती आपल्याच स्पर्शाची

घेऊन अलगद आपण, हातामध्ये आपुलेच हात
हलकेच ठेऊन बिल, वेटरचाही गेला हात
खुप वेळ आता झाली, शपथ पुन्हा येण्याची 

© शिवाजी सांगळे 

शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

भरलात मनी (लावणी)

भरलात मनी (लावणी)

मन आज का हरलं, का हो तुम्हावर जडलं?
सांगा सख्या तुम्ही, आक्रित कसं हे घडलं?

नव्हतं आजवर ध्यानी, न् माझ्या हि मनी
दिसलात जवा तुम्ही, भरलात माझ्या मनी
अवंदाच सोळाव सरलं, तवा तुम्हाला हेरलं
मन आज का हरलं....

वेगळाच तुमचा तोरा, नजरेत आग्रही होरा
बेभान करतो मला, रात दिन मग तो सारा
याड असं हे कसलं, तुम्ही मला हो लावलं?
मन आज का हरलं....

कसं सांगु तुम्हाला, होतयं काय ते मला?
एकदा याच तूम्ही, संगतीला मज जोडीला
करुया दोघं कमाल, बघतील लोक धमालं !
मन आज का हरलं....

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t26588/new/#new

बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... नोट बदली


पण काहीही म्हणा...
नोट बदली

दोन हजार जरा...से
जादाच नाही का झाले?
खर्चास काढू म्हणता
सुट्टेच मिळेनासे झाले !

नोट बदलीचा हा निर्णय
एकदाचा तो घेवुन झाला,
पण काहिहि म्हणा त्यानं
देश गुलाबी नाही झाला !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t26546/new/#new

"चिमणी वाचवा निसर्ग वाचवा" (नाटिका)

नमस्कार मित्र हो,

माझ्या एका छोटूश्या मैत्रीणीच्या आग्रहाखातर लिहीलेली एक छोटीशी नाटिका "चिमणी वाचवा निसर्ग वाचवा" सादर करीत आहे, सदर नाटिकेला माननिय बाल साहित्यिक व कथाकार श्री एकनाथजी आव्हाड यांचे पुढील प्रमाणे मनोगत लाभले आहे...

"पर्यावरणाचा संदेश देणारी तसेच मुलींचा सन्मान वाढवणारी आजच्या समाजमनाला सहज भिडणारी ही बालनाटिका मुलांना सादर करायला तर आवडेलच शिवाय त्यांना खूप काही शिकवून जाईल. अभिनंदन आपले."

"चिमणी वाचवा निसर्ग वाचवा"

1. (झाड क्र. 1 – 2 – 3) झाडांच्या रुपात तीन मुली दिड ते दोन फुट अंतर ठेऊन उभ्या आहेत.
2. (मुलगी क्र. 1) हातात पाण्याचं भांड व दाणे/धन्य ते आजूबाजूला टाकते व पाण्याचं भांड ठेवते.
3. (चिमणी क्र. 1) पंख हलवीत येते व झाडा शेजारी उभी राहते.
4. (मुलगी क्र. 2) चिमणीचे घरटे हातात घेऊन येते व (मुलगी क्र. 1) च्या शेजारी उभी राहते.
5. (चिमणी क्र. 2 व 3) पंख हलवीत विरुद्ध दिशेने  त्याच वेळी तेथे येतात.
               ----- xx X xx -----
झाड-१ : काय उकडतंय नाही?

झाड-२ : हो न. सुर्य नुसता आगच ओकतोय, कधी पाऊस पडतोय असं झालय?

झाड-३ : एवढयात कसला येतोय पाऊस? आधी उन्हाळा तर जाऊ दे!

झाड-२ : मग काल एवढे ढग कशाला आले होते?

झाड-१ : हो. तुझ्या डोक्यावर सावली धरायला आले होते.

चिमणी क्र. १   पंख हलवीत झाडां मागे जाते व मान बाहेर काढून अवतीभोवती पहात झाडांशी बोलू लागते.

चिमणी क्र १ : बाई गं, खूप दमले मी, जरावेळ सावलीत बसू का? करू का थोडा आराम तुमच्या खांद्यावर बसून?                       (सर्व झाडे एकमेकाकडे पाहून हसतात)
त्याच वेळी तीची नजर दाणे टाकलेल्या ठिकाणी जाते व ती ईतर चिमण्यांना सुध्दा बोलावते. तिघी दाणे टाकलेल्या जागी गोल फिरून दाणे शोधू लागतात.
(मुलगी क्र. 2) चिमणीचे घरटे जमिनीवर ठेवते, व मोबाईल टावर सारखी उभी राहते.

चिमणी क्र १ : थांबते, हे बघा इथेच आहेत दाणे, या खायला.

चिमणी क्र ३ : (विरोध करीत) खात्री केल्या शिवाय खाऊया नको, हल्ली खरं नाही या माणसांच!

चिमणी क्र १ : मला तर बाई खूप भूक लागली आहे.

चिमणी क्र २ : तुला सांगते, या मोबाईल टावरच्या लहरीमुळे खूप त्रास होतो, डोकं गरगरतं नुसत.

चिमणी क्र १ : तू काय सांगतेस? मी तर त्या मोबाईल टावरचं घरट बांधलं होतं, हा  आता आलं लक्षात त्या टावरच्या लहरीमुळे थकायला होतं मला.

चिमणी क्र २ : हो गं, नाहीतरी या माणसांनी कौलारू घरं तोडून सगळीकडे टावर बांधले. कौलारूघरामध्ये त्या माणसां सोबत आपल्याला पण जागा मिळत होती थोडी फार.

चिमणी क्र ३ : ते झालच, ही माणसं बिल्डिंगला काचा लावतात, सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने किती उकडतं? त्यात भर म्हणुन रस्त्यावरच्या गाड्या, त्या मुळे काय कमी गरम होतं? तरी बरं ही झाडं आहेत. ( सर्व झाडे एकमेकाकडे पाहून आनंदाने हसतात)

चिमणी क्र १ : अगं. पण ते दाणे कधी खायचे आपण? बसलो आपण गप्पा मारीत, आपल्याला पण त्या बायकांचीच सवय लागली.

चिमणी क्र ३ : दाणे खायचं ठीक आहे, सापळा तर नसेल ना तीथे? आधीच आपली चिवचिव संख्या कमी झाली आहे, त्यात हे टपोरी कावले नेहमी छेड काढत असतात.

चिमणी क्र २ : तसं नाही, त्यांनी म्हणजे माणसांनी आपली रहायची सुद्धा सोय केली आहे, ते बघ घरट. (घरट्या कडे इशारा करते)

चिमणी क्र ३ : चला मग दाणे खायला... तिघी दाणे खायला जातात.

झाड क्र. १: पाहिलंत, कित्ती विश्वास आहे त्यांना आपल्यावर? नाहीतर ही माणसं, पार तोडून तोडून आपली संख्या कमी करीत सुटले आहेत.

झाड क्र. ३: हो खरं आहे, काही समजतं कि नाही त्यांना?

झाड क्र. २: हो, हों अगदी खरं आहे, बघा आजूबाजूचा सारा परिसर कसा उघडा बोडका झालायं यांच्या मूळ, स्वतः साठी पण सावलीला जागा ठेवली नाही त्यांनी.
(मुलगी क्र. 1) स्वतः कडील मोबाईल फोन काढून बोलू लागते.... हलो हलो.... काही बाही बोलत राहते, त्याच वेळी मोबाईल टावर झालेली मुलगी डोलू लागते.

चिमणी क्र ३ :  पळा, झाला टावर सुरु ...

चिमणी क्र २ : चला झाडावर बसूया, तिथे आही धोका नाही आपल्याला.

चिमणी क्र १ : खरचं, ही झाडचं आपल्या कामाला आली, माणसांना कधी कळणार कि झाडे वाचवा, पशु पक्षी वाचवा? निसर्ग वाचवा? अजुनही वेळ गेलेली नाही सावध व्हा, निसर्ग वाचवा असच ऐकत मोठे  झालो ना आपण?
हिच माणसं, मुलगी झाली तर.. माझी चिऊ म्हणत उराशी कवटाळत असतात ना तीला? मी तर आता असं म्हणेन कि...

    “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा “
       आणि
    “मुलगी वाचवा, समाज वाचवा “

(सर्व जणी एका रेषेत उभ्या राहून प्रेक्षकांना अभिवादन करतात व पडदा पडतो)

 लेखक : शिवाजी सांगळे ©

तीचं - माझं

तीचं - माझं

तीचं माझं आजकाल
बर्‍यापैकि बिनसतं,
भेटायचं ठरवूनही
भेटीचं गणित कुठे तरी चुकतं !
मग, दोष द्यायचा
तीनं मला, मी तीला,
शोधल्यावर कळतं
कारणचं नव्हत, भेट न व्हायला !
पुन्हा होतो सुरू
खेळ अबोल्याचा,
होत नाही पुढे
बट्टी साठी हात, माझा किंवा तिचा !
किती काळ चालणार?
असा हा रूसवा?
माहीत असतं दोघांना
राग हा असतो तात्पुरताच फसवा !
पुन्हा भेट होते
थोड्याच वेळापुरती,
कधी रागाने, कधी प्रेमाने
एकटक बघतच राहते मग नुसती !
मी मात्र वेड्यागत
वाट पाहतो ती बोलायची
तीच्या मनात असतं
याचीच वेळ आहे साँरी म्हणायची !
काहीच बोलत नाही
दोघ गप्पच उभे असताे,
बोलायचं कुणी आधी
हाच विचार दोघांच्या मनी असतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t26538/new/#new

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

पोरका (गज़ल)

पोरका (गज़ल)

अंधाराचा मी, इतका लाडका झालो,
सावलीस माझ्या, मीच पोरका झालो !

छळले कित्तेक, सुखांनी कधी म्हणुनी
दुःखांनाही मग, मी हवा हवासा झालो !

देवु किती दोष, मलाच तो मी माझा?
झेलुन आरोप, कित्तेक लोकांचे आलो !

साक्ष निरपराध्याची, एकदा काय दिली
गुन्हेगार ईथे मी,   कायदेशिरच झालो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26469/new/#new

फिर रात भर...


रिटायर्ड झाल्यावर

रिटायर्ड झाल्यावर

       दिड एक वर्षभरापुर्वी रिटायर्ड झालेला मित्र परवा भेटला, तसाच पुर्वी सारखा हसतमुख, खट्याळ व बोलका, काही बदल नव्हता त्याच्या वागण्या बोलण्यात, बरं वाटल त्याला पाहुन. त्याही पेक्षा एक नवी दिशा सापडली त्याच्या बोलण्यतुन.

      चार पाच जण सहज गप्पा करीत असतांना कुणी तरी त्याला विचारले, "काय करतोस रे हल्ली? कुठे पार्ट टाईम जातोस कि नाही? यावर तो जे काहि म्हणाला त्यातुन सर्वांनी बोध घ्यावा असं होतं ते...

       अरे काहीच करीत नाही, मस्त पेपर वाचतो, बायको सोबत गप्पा मारतो, वेळ प्रसंगी कामात मदत सुद्दा करतो, मित्र मंडळी व नातेवाईकांना ईतके दिवस जो वेळ देउ शकलो नव्हतो तो देतोय, देवळात जातोय, मस्त मनाला आवडतात ती गाणी ऐकतो, पहायचे राहून गेलेले जुने चित्रपट पाहतो, छान एन्जाँय करतोय सारं. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं वाढवायची जी उणिव राहिली होती ती नातवंड वाढवताना घेतोय, तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? सगळे जण तेच तर करतात रिटायर्ड झाल्यावर; तरीही त्यात वेगळी गंमत आहे. अरे, आपली मुलं कशी मोठी झाली आठवतं का तुम्हाला कोणाला? यावर दोघांनी नकारार्थी माना हलवल्या, बाकीचे गप्प होते.

       तो पुढे सांगु लागला अरे, आम्ही दोघं नोकरी करणारे, रोज सकाळी घाई घाईत आवरून ट्रेन पकडायला बाहेर पडायचो, त्या दरम्यान मुलांच आवरण, त्याचे कपडे, खाणं वगैरे डब्यात भरून त्यांना बेबी सिटींग मधे सोडाची घाई असायची. दिवसभराचं सर्व उरकुन घरी आल्यावर साहजिकच पहिलं लक्ष मुलां कडेच द्यावं लागायच. पुढे मुलं मोठी झाली तरीही परीस्थितीत काही विशेष फरक पडला नव्हता, त्या काळात खरोखर मुलांचे हट्ट, लाड पुरवता आले नाही, बाकि लौकीक अर्थाने त्यांच्या गरजा पुरवित होतो ईतकच, कधी कधी त्यांच्या लहान सहान गोष्टीकडे, हट्टा कडे दुर्लक्ष करावं लागलं. नोकरी पेक्षा प्रवासाने जास्त थकुन जायचो, शरीरात त्राण उरत नव्हते, त्यामुळे चिडचीड व्हायची, जे हाल माझे तेच बायकोचेही व्हायचे.

       मुलांच बालपण खऱ्या अर्थाने अनुभवलं नाही आम्ही व मुलांनी सुद्धा. खरचं आता ती खंत जाणवते, घर, संसार चालवण्याच्या चक्रात त्यांच बालपण हिरावून घेतलं व स्वतःच तारूण्य शर्यतीला जुंपलं, नाहीतर काय? दिवसेंदिवस हा जीवन संघर्ष कठीणच होत चालला आहे. अरे, आपला काळ तर कसातरी सरला, पण आजची पिढी! लांब कशाला, माझ्या मुलाच व सुनेचच उदाहरण घ्या, आपल्या पेक्षा जास्त धावपळ, दमछाक होते अश्या नोकऱ्या, त्या करता करता येणरी वेगवेगळी टेंन्शस्, कंप्युटर असुन सुद्धा कामाचा म्हणावा तसा उरक नाही हल्लीच्या पिढीकडे. खैर, काळा नुसार हे होतचं रहाणार व त्या प्रमाणे जगावे लागणार, आणि ते जगता जगता मुलांची गरज म्हणा कि आपली? सोबत रहायचं सुख तर मिळत, दोघांनाही.

       मुलांसाठी जे जे करायचं राहिलं होतं ते आज नातवंडाच करून ती कसर भरून काढतो आम्ही दोघं, नातवंडाशी खेळतो, त्यांना गोष्टी सांगतो, अभ्यास घेतो फार समाधान मिळतं त्यातुन. तरीही घर म्हटलं कि भांड्याला भांड लागायचंच, पण तेही तेवढया पुरतचं राहतं, शेवटी कुणासाठी केली होती इतक्या वर्षांची धडपड? केलेल्या धावपळीत सुख म्हणजे काय हे समजल नव्हतं ते आता समजतय, नातवंड वाढवताना, आपलचं रूप आपण घडवतोय असं वाटतं, कुणी तरी म्हटलंच आहे कि दुधा पेक्षा दुधावरची साय जास्त आपलीशी वाटते. दोस्तो, हेच खरं.
     
       मी तर माझ्या मुलांना सांगीतलयं खुप धावपळ करू नका, केवळ पैसा कमावणं हाच शेवट नाही, आपल्या मुलांना, कुटुंबाला, माणसांना वेळ द्या, त्याच्याशी बोला, संवाद साधा, मान्य कि आजची महागाई, शिक्षणाचा, औषध पाण्याचा खर्च पाहता पैसा कमी पडतो, त्याची आवश्यकता आहे, तरीही अनावश्यक स्पर्धा व त्यातुन येणारे खर्च टाळा. योग्य नियोजन करूनही चांगल व सुरक्षित जीवन जगणं आपल्याच हाती आहे. आम्हाला नाही जमलं ते नीट पणे, पण आता तुम्ही ते जमवु शकता, किंबहुना तसा प्रयत्न करू शकता तेवढा आधार आहे तुम्हांला आमचा.

       इतकं सारं तो भरभरून व कौतुकाने सांगत होता व आम्ही मुग्ध होउन ऐकत होतो, अर्धा-पाउन तास केव्हा उलटला हे सुद्धा कळल नाही. कुणी तरी म्हटलं "अरे चला कामं नाहीत का?", तेंव्हा त्याचा निरोप घेउन एक एकजण मार्गस्थ झाला, मी सुध्दा निघालो, पण मनात त्याचे शब्द पिंगा घालीत होते. खरचं आपण सुद्दा या पेक्षा वेगळ काय केलं? हा प्रश्न काही केल्या मनातुन तेवढा जात नव्हता.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26182/new/#new 17-11-2016

गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

पोरका

पोरका

अंधाराचा मी, इतका लाडका झालो,
सावलीस माझ्या, मीच पोरका झालो !

©शिव

संसार


रिक्तता

रिक्तता

सांज का रिती एकाकी
आठवणी सोडून आली,
सोबती कुणीच नाही
बंध सारे तोडून आली !

आज ना तरळले अश्रु
ओलावले नाहीच डोळे,
स्वप्ने थिजवुन पापणीत
अंधारात उघडेच डोळे !

मन ठाव कसा लागावा
रिक्त अंधार पोकळीला,
आलेच भरून नभ जरी
रिक्तता उरे आभाळाला !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t26438/new/#new

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

वापसी की राह से...


पाती


वळण वाट

वळण वाट

प्रवास कुणाचा कुठवर
कोणास का ठावूक आहे?
प्रवास हा पाऊल वाटेचा
जसा शहरा पर्यंत आहे !

शोधते कोणास हि वाट?
परिचित कुणी दिसते आहे?
वळणावरून जे वळून गेले
परत का ते वळणार आहे?

सुख दुःखे, अशीच वळणे,
कोण त्यां चुकविणार आहे?
नाते पाऊल वाटेचे शहराशी
वळणां सह जुळणार आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t26432/new/#new

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

कंदिल


कंदिल

लाईट नसलेल्या गावात...
गुरं परतीच्या सांजेला
नाजुक कापर्‍या हाताने
फुई आजी राखेने
लख्ख काच पुसायची
कंदिल प्रकाशात पार
उजळून जायची पडवी
गुरांच्या स्वासांचा...,
घंटाचा नाद घुमु लागे...
तोवर कुणी घोंगडी अंथरे,
मधोमध कंदिल
आजीेच्या पुढ्यात हरीपाठ
कोंडाळ करून आम्ही मुलं,
"देवाचीये द्वारी..." पासुन
"आरती ज्ञानराजा..." पर्यंत
गोड समाधी, भारणारी
शेवट... साखर शेंगदाण्याचा
मिठाई पेक्षा, गोड प्रसाद
आता विज आली अन्
हरीपाठ... हरवला...
आजी संगे...हरवला,
कंदिल आठवणीतला!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26384/new/#new