बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! पुन्हा स्वामी


दे धक्का...!
पुन्हा स्वामी

कोण योग्य कोण अयोग्य
वदले पुन्हा सुबह्मण्यम स्वामी,
यांना काढा त्यांनाच नेमा
दरवेळी आग्रह करतात स्वामी!

दिल्लीत म्हणे  गरज आहे
संघाच्या माणसाच्या नेमणुकीची,
जंग यांना पदावरून काढावे?
गरज नाही  वाटली कारणांची?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25221/new/#new

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! प्रसिध्दी धाव


दे धक्का...!
प्रसिध्दी धाव

कुणी काय खावं अन्
कुणी काय खावु नये,
हा फुकट सल्ला मात्र
कुणी कुणाला देवु नये !

आपलं काम आपण
प्रामाणिक पणे करावं,
प्रसिध्दी साठी उगाच
का तीच्या मागे धावावं?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25205/new/#new

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! रडीचा डाव

दे धक्का...!
रडीचा डाव

रोखठोक प्रश्नाला उत्तर नाही
जुनचं रडगाणं पुन्हा गात राही,
काश्मिरचं धुणं तुम्हा धुता येईना
आंतरराष्ट्रीय स्तरावर रडत जाई!

बाविस काय बाविसशे पाठवा
सहलीला तुमचे तुम्ही खासदार,
नेलात वाद जरी दोघांचा जगभर
खोटं ते कायम खोटंच राहणार !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25187/new/#new

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

वेदना

वेदना

आसवे पुजलेली पाचविला नेत्रांच्या
आहुती वेदनेची जशी नश्वर देहाला !

© शिव 🎭

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

समाज

समाज

केंव्हांच पुरले गेले
समाज पुरूष
तुमच्या आमच्यातले
जागवित होते जे
निंद्रीस्त समाजाला

आहेत काही मोजके
आजही जे...
उठवू शकत नाहीत
निंद्रेच सोंग घेतलेल्या
ढोंगी समाजाला

ज्यांना कसली चाड
सुकलेल्या रक्ताची
वा ओघळत्या
कोवळ्या आसवांची

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t25167/new/#new

रूप तुझे


गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

मला वाटते... पेरण्या पर्याय

मला वाटते... पेरण्या पर्याय

काल पेपरात एक बातमी वाचली, "कांद्याचे भाव गडगडले, कांदा फक्त पाच पैसे किलोने विकला गेला", खरचं फार दयनिय अवस्था झाली आहे शेतकर्‍याची. काय करावे त्याने? हमी भाव सुध्दा मिळत नाही.

एकिकडे पिक कमी झालं तर भाव वाढीमुळे हाच कांदा सामान्यांना रडवतो, व पिक अमाप झाले तर शेतकर्‍याला रडवतो. कांदा मात्र आपला रडविण्याचा गुणधर्म सोडत नाही.

या नेहमीच्या अडचणीवर तज्ञ मंडळींनी शोध घेउन उत्तर शोधावे व यातुन सर्वांची सुटका करावी. मी काही शेती तज्ञ वा जाणकार नाही तरी मला सुचलेला एक उपाय मांडत आहे, बाजाराचा अंदाज घेवुन गावात विचार विनिमय करून प्रत्येकाने वेगवेगळी पीके घेवुन सामुहीक पध्दतीने शेती केली जाउ शकते, अर्थात हा उपाय किती व्यवहार्य आहे हे तज्ञ मंडळी सांगु शकतील, तर काहींना हा पर्याय पटणार देखिल नाही, तरीही सुचवावासा वाटला, वाँट्सअँप वरील एका पोस्टने प्रेरीत होउन सुचलेला हा...

"पेरण्या पर्याय"...

करोन विचार
शेत ते पेरता
शक्य होते घेता
दुजे पिक

कुणी लावा कांदे
कुणी ते टमाटे
उरल्यां बटाटे
लोवोनिया

पर्याय असता
अन्य पिका साठी
दौड का ती मोठी
कांद्या साठी

वैविध्याचा मंत्र
ठेवोनिया ध्यानी
सर्व त्या बळींनी
पिकां साठी

विचार पुर्वक
घेता समजुन
हाटा उमजुन
घ्यावे पिक

हिणवण्या कोणा
नाही ईथे डाव
कल्याण ते व्हाव
कुणब्याचं

ईश्वरा प्रार्थना
करोनी वंदन
दे भरभरून
धान्य पाणी

होईल स्वयंभु
शेतकरी राजा
विश्वास तो माझा
म्हणे शिवा

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25155/new/#new

दे धक्का...! उत्सवांचा त्रास


दे धक्का...!
उत्सवांचा त्रास

राजकिय चढाओढी साठी
आता सणांचा वापर होतो,
दहिहंडी आली कि उंचीचा
अकारण विचार केला जातो!

गणपतीत मंडप वाद, तर
नवरात्रीत गर्बा विषय होतो,
दिवाळीत आवाजाचा त्रास
दरवर्षी सर्वांना कसा होतो?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25148/new/#new

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! नको त्यांना फाशी


दे धक्का...!
नको त्यांना फाशी

अज्ञानी चुकला तर हसु येते
ज्ञानी चुकला तर काय होते?
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकीने
नविन वादाला तोंड फुटते !

केंद्रीय शिक्षण मंत्रीच जर
नको त्यांना देवु लागले फाशी?
असल्या शैक्षणिक वातावरणात
पिढी येणारी शिकेल कशी?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25140/new/#new

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! लाखांची गोष्ट


दे धक्का...!
लाखांची गोष्ट

तीन लाखांवरचे व्यवहार
या पुढे आता बंद होणार?
देशाचं भलं होवो न होवो
काहींची मात्र गोची होणार!

काळ्या पैशावर या, काबू
ठेवायला याची मदत होईल,
सर्व पक्षीय राजकारण्यांची
मदत देशास उन्नतीकडे नेईल!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25127/new/#new

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

मला वाटते... आँलिम्पिक निमित्त

मला वाटते...
आँलिम्पिक निमित्त

पी व्ही सिंधु व साक्षी मलिक यांनी त्याच्या क्रिडा प्रकारात अव्वल खेळ करून देशाचं व स्वतःचं नाव मोठं केलयं या साठी त्या दोघींचं व त्याच्या प्रशिक्षकांच मनःपर्वक अभिनंदन.

आज त्यांच्यावर अनेक राज्यांतुन नानाविध बक्षिसांची घोषणा आता होउ लागली आहे, हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे, त्या दोघींनी आज जगभरात भारताचे नाव मोठे केलंय, त्याच कौतुक निश्चितच व्हायला पाहीजे व ते होत आहे.

दुसरा एक विचार करता असं वाटतं कि आज जी बक्षिसं त्यांना दिली जात आहेत, तीच रक्कम जर यापुर्वी त्यांच्या चांगल्या प्रशिक्षणावर, सुविधांवर खर्च केली गेली असती तर? आज जे यश त्यांनी मिळवलं आहे त्या पेक्षा अजुन मोठं, उत्तुंग यश त्या मिळवू शकल्या असत्या, तसेच त्याच्या सारख्या अन्य खेळाडूना प्रशिक्षण घेण्यासाठी सुविधा झाली असती व आणखी नवे खेळाडू निर्माण झाले असते.

प्रत्येक राज्याने केवळ स्पर्धे उपरांत बक्षिसांची घोषणा करण्या ऐवजी होतकरू व मेहनती खेळाडूंना दत्तक घेवुन त्यांना उच्च प्रतिचं प्रशिक्षण पुरवुन जागतिक स्तरावर चमकण्याची संधी द्यायला हवी, योग्य क्रिडा धोरण अवलंबुन त्यात कोणाताही हस्तक्षेप न होउ देता सकारात्मक पणे राबवायला हवे, मग पहा किती पदकं आपल्या देशाला मिळतात ते.

मी एक सामान्य क्रिडा प्रेमी आहे कुणी क्रिडा तज्ञ वा जाणकार नाही, तेंव्हा सहज  मनात विचार आला कि जर अमेरिका, चीन, ब्रिटन व अन्य पदक तालिकेतील उच्च स्थानावर असलेल्या देशातील राज्यांनी अशाप्रकारे बक्षिसे दिली तर काय होईल? मलां वाटलं त्या त्या राज्यांना इतरांकडून कर्ज घेवुन बक्षिसं द्यावी लागतील इतके विजेते खेळाडू आहेत त्याच्या कडे आहेत.

भारतिय खेळाडू खुप प्रतिभावंत आहेत, फक्त योग्य सकारात्मक पोषक क्रिडा धोरण ठरवलं व त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली कि मग पहा पुढच्या स्पर्धे वेळी आपली पदक संख्या वाढते कि नाही.

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25116/new/#new

दे धक्का...! जात कंची?


दे धक्का...!
जात कंची?

खेळाडूंनी घाम गाळला
पदकांचीही कमाई केली,
इकडे मात्र खेळा सोडून
खेळाडूंची जात सर्चली !

एकविसाव्या शतका मध्ये
खेळामधे राजकारण करतो,
प्रोत्साहन वगळता, आम्ही
जात धर्म शोधण्यात रमतो!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25109/new/#new

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! कृती प्रतिनीधी


दे धक्का...!
कृती प्रतिनीधी

अधिकारी, कर्मचारी चुकलाच
तर त्यांना जाब विचारला जातो,
लोकप्रतिनीधीही मग काही वेळा
बेधडक त्यांच्यावर हात उचलतो!

चुकलाच जरी लोकप्रतिनीधी
त्यांना कुणी का जाब विचारतो?
अधिकारी, कर्मचार्‍यांची बिशाद
त्यांच्यावर कधी हात उचलतो?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25092/new/#new

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! "राज" कारण


दे धक्का...!
"राज" कारण

फिरून फिरून आम्ही
तीथंच पुन्हा परत येत असतो,
खाउन झालं किती तरी
शिळ्या कढीस उत आणत असतो !

"राज" कारण म्हटलं तर
सोयी नुसार विषय घेत असतो,
दर दोन पाच वर्षां नंतरच
महाराष्ट्रासाठी उर भरून येत असतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-''-25068/new/#new

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! श्रीमंतीचे परीक्षण


दे धक्का...!
श्रीमंतीचे परीक्षण

पापक्षालना साठी, माणुस
नेहमी जातो देवाच्या दारी,
देवास काय ठावूक, माणुस
तीथेही करीत असतो चोरी !

आपोआप गायब होते सोने
पद्मनाभ मंदिरातून कोटींचे,
काढावेच सरकारने शोधुन
गुंतलेले हात ज्या कोणाचे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25060/new/#new

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! बंधन


दे धक्का...!
बंधन

बंधनात अडकतात नाती
राजकारणात का टिकती?
आधी शिवबंधन होते,आता
अटलबंधनाची हो चलती !

समयानुसार होताना बंधने
तयास म्हणतात वाटे युती?
वाटा नसता सत्तेत, कधी
होते भाषा, तोडण्याची युती!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25037/new/#new

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! सत्तरीतलं स्वतंत्र्य?


दे धक्का...!
सत्तरीतलं स्वतंत्र्य?

गौरव करता करता इतिहासाचा
भविष्याचा विचार कधी करणार?

आधुनिक युगात आम्ही जगतांना
अंधाअनुकरण किती करणार?

दलित व महिलांवरचे अत्याचार
सत्तराव्या वर्षी असेच का राहणार?    

असंख्य सारे प्रश्न अनुत्तरीत असे
पिच्छा आमुचा कधी सोडणार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25025/new/#new

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! तिरंगा


दे धक्का...!
तिरंगा
भारत माझा देश महान
आम्हा त्याचा अभिमान,
पाहतो त्या बनवु आम्ही
जगती एक मोठी शान !

मान आमुचा असे तिरंगा
फडकावू आम्ही डौलाने,
स्वातंत्र्य दिना उपरांत, त्या
आम्हीच सांभाळू मानाने !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24996/new/#new

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! उद्रेक


दे धक्का...!
उद्रेक

कायदा हातात घेणं, हे
कधीच समर्थनिय नाही,
म्हणुन प्रशासनाने का?
समस्यांकडे पहायचे नाही?

रोज म.रे., स्तोव जगतांना
प्रवासी जीव टांगुन असतो,
नसता सुचना सहानुभुतीच्या
मग प्रवाश्यांचा उद्रेक होतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24989/new/#new

रंग भाव



प्रभु तू कृपाळु...

"प्रभु तु दयाळू, कृपावंत दाता" या मुळ गाण्याचे विडंबन, गीतकार श्री उमाकांत काणेकर यांची क्षमा मागुन...

प्रभु तू कृपाळु...

प्रभु तु कृपाळु, रेल्वे मंत्री मोठा
वेळेवरी सोड तूच गाड्या आता!

कामधंद्या जाण्या दिली रेल गाडी
जाता येता काढे आमुची ती खोडी
प्रवासा नसे रे दुजा मार्ग आता...

तुझ्या गाड्यांमधे नसता सोई फार
करीतो प्रवास इथला लहान थोर
ऐकूनी सतत अनाउंन्समेंट बाता...

आम्हा प्रवाश्यांना सुख काय ठावे
मजबुरी मुळेच लागे स्टेशना यावे
अन्य कुठे जावे तुच सांग आता...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t24993/new/#new

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! पाकिस्तानी हात


दे धक्का...!
पाकिस्तानी हात

काश्मिर मधला हिंसाचार
हे पाकिस्तानचचं बीज आहे,
कसाब नंतर, बहादूर अलीनंही
आता जग जाहिर केलं आहे !

पाकिस्तान सैन्यानं कितीही
नाहि म्हटलं, तरी हे सत्य आहे,
भारतातील हिंसाचारा मागे
हिजबुलसह त्यांचाच हात आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24974/new/#new

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! बदलतं वारं!


दे धक्का...!
बदलतं वारं!

कुठे भ्रष्टाचार, कुठे घोटाळे
विनयभंग तर कुठे बलात्कार,
राजकिय सत्ता चढाओढीतून
आरोप प्रत्यारोपांचा भडीमार!

गो रक्षे वरून वादावादी, तर
उनात दलितांवर अत्याचार,
लगीनघाई आहे जीएसटीची
अन् सोबत महागाईचा मार !

कुणा स्वतंत्र राज्याचा हट्ट, तर
आतंकवादाने मेलं काश्मिर खोरं,
दिसतयं सत्य उघड्या डोळ्यांनी
पण आडवं येतं राजकारण सारं!

प्रत्येकाला वाटत असावं, कि
आम्ही करतोय ते ठिकचं सारं,
बदलेलं आहे निसर्गाने आधीच
देशात सुध्दा बदलतयं ना वारं?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-!-24947/new/#new

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! जगण्याचा नियम


दे धक्का...!
जगण्याचा नियम

नुकताच परिवहन मंत्र्यांनी
जारी केला आहे फतवा,
रस्ते नियम मोडणार्‍यांच्या
दंडात केला आहे वाढवा !

सुरक्षित पणे चालवा वाहने
पाळून वाहतुकिचे सर्व नियम,
काळजीपुर्वक जगा, जगु द्या
हाच आहे जगण्याचा नियम !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24938/new/#new

रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

आभाळ मनातलं

आभाळ मनातलं

बरेच मळभ दाटलेले,
अन्, सर पावसाची आली
थोड्यातच सरून गेली,
दुसरी सर मनात आली...
बरीच थांबलेली, ओथंबलेली
का असं झालं?
अगदि भरून आलं?
पाझरू लागले अश्रु,
आणि वाटू लागलं हलकं,
कसं असतं ना,
वर ढग दाटतात,
मनात? विचार दाटतात...
मोकळं होईस्तोवर
पिंगा घालतात!
कसले कसले विचार ते?
स्वत: फसवल्याचे!
कि फसले गेल्याचे?
नकळत काही केल्याचे?
पाप पुण्याच्या कल्पना...
मग, घेवु लागतात जन्म
स्वत:ला वाचवू पाहतात,
सोई प्रमाने जगायला
शिकवु लागतात,
उतरणार्‍या क्षार दवांना
थिजवु लागतात...
का हे असं होत?
मनातलं आभाळ दाटतं?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24927/new/#new

माणसं


शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

वाट वळणाची


झाले काल काही

झाले काल काही

नाते सुखाशी कधी, कसे जुळलचे नाही,
साथ मैत्रीचा दुःखांनी, त्या सोडला नाही!

साक्ष दिल्या सुखाची, देण्यास कोण आहे?
जल्लोष मज सुखाचा,दवंडीत घुमतो आहे!

निसटते ओंजळ वाळू, कोणास ठाव आहे?
सुर्यास्त इथे नित्याचा, किनारा एकटा आहे!

झाले काल काही, सारे ते विरूनी गेले,
सांजवेळी का असे, पुन्हा आठवुन आले?

© शिवाजी सांगळे 🎭

दे धक्का...! एकमत


दे धक्का...!
एकमत

परस्परांना विरोध करणारे नेते
फायद्यासाठी एकमताने तयार होतात,
कोणतीही घासाघीस न करता
स्वतःचे पगार,भत्ते वाढवुन घेतात !

मंत्री, राज्यमंत्री व आमदारांचे
वेतन सचिवांच्या बरोबरीने होणार,
अधिवेशनाचं फलित होवो न होवो
सातवा वेतन आयोग लागू होणार !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24902/new/#new

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! घातपात


दे धक्का...!
घातपात

दुर्घटनेची कारणे आता
सर्वांकडून शोधली जातील,
आरोप प्रत्यारोप करून
चौकश्यांचे फार्स केले जातील!

एकदा विचारा त्या नदीला
का असा तीने अपघात केला?
तीही सांगेल, उपसुन वाळू
तुम्हीच माझ्याशी घातपात केला!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24896/new/#new

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! उत्तर राहून गेले


दे धक्का...!
उत्तर राहून गेले

वाहणारे पुरात वाहून गेले
कुटुंबियांचे अश्रु विरून गेले,
डंका पिटणारे कार्यक्षमतेचा
सुरक्षित गोंधळ करून गेले !

बांधलेल्या पुलाचा हिशोब
शतकानंतर गोरे सांगुन गेले,
द्यायचा दोष कोणास येथे ?
विचारून चारही खांब गेले !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24878/new/#new

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

वाटा...


वाटा

अश्वस्त किती काळ रहावे?
बांधली जरी शिल्पे तटावरी
फिरते घेउन वादळास येथे
लाट येण्या ती किनार्‍यावरी !

अखंडतेचा ध्यास धरावा
कुठवर आता ह्या पावलांनी,
उरतात जखमा येथल्या
वाळूवर मग कणा कणांनी !

हेलकावे मनाचे हे जणू
वाहतात या सागर लाटा,
उमटविल्या जरी कितीही
मिटतात वाळूवरील वाटा !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24872/new/#new

दे धक्का...! निष्काळजीचा फटका


दे धक्का...!
निष्काळजीचा फटका

निष्काळजी पणाचा फटका
ब्रिटीशकालीन पुलाने दिला,
आगावु सुचना मिळून सुध्दा
पुल वाहतुकीस होता खुला!

बेपत्ता झालेली माणसं, वाहनं
कधी, कशी शोधली जाणार?
घडलेल्या दुर्घटनेची अंतरीम
जबाबदारी आता कोण घेणार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24870/new/#new

सांज चारा


!! श्रावण !!

!! श्रावण !!

शब्द सरी बरसल्या, मन चिंबचिंब झाले,
श्रावण महतीने मन कसे श्रावणमय झाले !

प्रथम, श्रावण स्वागता व्रत नागपंचमी आले,
जाणिवेने सण व्रतांच्या मन उल्हासित झाले !

व्दीतीय, नारळी पौर्णिमा श्रीफळ रत्नाकरा अर्पिले,
टिकविण्या नाते जन्माचे रक्षाबंधना भाऊराय आले !

तृतीय, मंगळागौर सणाला नव्यानवरींनी अंगण सजले,
झिम्मा फुगडया खेळांनी जागरण खेळता रंगले !

चतुर्थ, गोकुळी अष्टमीला सावळे श्रीकृष्ण जन्मले,
नंतर बाळगोपाळ एकत्र दहिहंडी साठी खेळले !

पंचम, अमावस्या पुन्हा बैलपोळा नावाने म्हटले,
कष्टतात जे वर्षभर सारे कृतज्ञतेने त्यांना पुजिले !

© शिवाजी सांगळे 🎭

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! लोकल/टेल्गो


दे धक्का...!
लोकल/टेल्गो

एक नवं क्रांती पर्व
आता सुरू होणार आहे,
सर्वाधिक वेगवान "टेल्गो"
भारतीय रेल्वेत आली आहे!

वेगवान "टेल्गो"चं स्वागत
आपण मना पासुन करायचं,
एक विनंती रेल्वे प्रशासनाला
ठेवायच भान लोकल समस्यांच!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24849/new/#new

सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

असा किनारा


दे धक्का...! श्रध्दा कि संपत्ती?


दे धक्का...!
श्रध्दा कि संपत्ती?

शिर्डी विश्वस्तमंडळा साठी
राजकारण्यांची नसतांना मर्जी,
काही पुढार्‍यांनी लागलीच
जाहिर केली आपली नाराजी !

बाबावरची श्रध्दा म्हणायची?का
नजर भरणार्‍या त्या झोळीवर?
प्रत्येकाला मात्र कायम वाटतं
पडावं तुप आपल्याच पोळीवर !

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24826/new/#new