बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

वाटा...


वाटा

अश्वस्त किती काळ रहावे?
बांधली जरी शिल्पे तटावरी
फिरते घेउन वादळास येथे
लाट येण्या ती किनार्‍यावरी !

अखंडतेचा ध्यास धरावा
कुठवर आता ह्या पावलांनी,
उरतात जखमा येथल्या
वाळूवर मग कणा कणांनी !

हेलकावे मनाचे हे जणू
वाहतात या सागर लाटा,
उमटविल्या जरी कितीही
मिटतात वाळूवरील वाटा !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24872/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा