बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! बदलतं वारं!


दे धक्का...!
बदलतं वारं!

कुठे भ्रष्टाचार, कुठे घोटाळे
विनयभंग तर कुठे बलात्कार,
राजकिय सत्ता चढाओढीतून
आरोप प्रत्यारोपांचा भडीमार!

गो रक्षे वरून वादावादी, तर
उनात दलितांवर अत्याचार,
लगीनघाई आहे जीएसटीची
अन् सोबत महागाईचा मार !

कुणा स्वतंत्र राज्याचा हट्ट, तर
आतंकवादाने मेलं काश्मिर खोरं,
दिसतयं सत्य उघड्या डोळ्यांनी
पण आडवं येतं राजकारण सारं!

प्रत्येकाला वाटत असावं, कि
आम्ही करतोय ते ठिकचं सारं,
बदलेलं आहे निसर्गाने आधीच
देशात सुध्दा बदलतयं ना वारं?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-!-24947/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा