शनिवार, २३ मे, २०२६

लोकं काय म्हणतील























लोकं काय म्हणतील

चार लोकं काय म्हणतील यातच वेळ गेला
त्या चार लोकांपैकी एक कामी नाही आला

सर्व जबाबदाऱ्या काही ओझी आणि चिंता
विचार करणारा,मात्र कायम वाहत राहिला

कुणाला नसते पडलेली उगाच कुणाची इथे
जो तो असतो नेहमी, मस्त स्वतःत रमलेला

हिच शिकायची, खरी दुनियादारी जगताना
आवडतं ते करावं,आनंदात ठेवावं स्वतःला

लोकांचं तर कामच आहे,करु देत, ते त्यांना
चार लोकांच काय जातं काहीही बोलायला

https://marathikavita.co.in/index.php?topic=81596.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा