शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... हातात हात


पण काहीही म्हणा...
हातात हात

राजकारणावर आता काही
नवं लिहावसं वाटत नाही,
कोणताही रंग कसा असो
कुणातच कसला दम नाही !

दाखवायचे दात प्रत्येकाचे
इथे वेगळे वेगळेच आहेत,
खातांना मात्र प्रत्येका हाती
एकमेकांचेच  हात आहेत !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25832/new/#new

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

!! आरती श्री स्वामी समर्थ !!


!! आरती श्री स्वामी समर्थ !!

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ!!धृ!!

कृपा तुमची सदैव असता, ना हो कुणी कष्टी
राहुनी अक्कलकोटी, असते आम्हावरी दृष्टी
गाउ किती, वर्णु किती, करू किती स्वार्थ
तुम्ही दिला, तुम्ही घडविला, जीवनासी अर्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!१!!

भिऊ नकोस म्हणता, नेमे पाठीशी असता
संकट काळी, बळ देउनी, हरविल्या चिंता
वेळोवेळी प्रत्यय देउन, दिले कृपा तिर्थ
होउन आता कृष्ण, करा शिवास कृतार्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!२!!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/!!-!!-25800/new/#new

लग्न म्हणजे ?


लग्न म्हणजे ?

लग्न म्हणजे काय असते?
दोन जीवांची गरज असते !

स्वतःची जरी नसली तरी
घरच्यांची ती निवड असते !

मिरवायचे जरी नसले स्वतः
इतरांची तशी हौस असते !

पहावं करून लग्न एकदा
लग्ना नंतर वरात असते !

वरात तर चालते जोरात
वर्‍हाडी मंडळी भरात असते !

चुकवत सारया त्या नजरा
जोडी स्वतःत गुंग असते !

सांभाळत उभयता संसार धुंदी
जीवना गोडी वाढवायची असते !

नाहीतर नवरा आपल्या घरी
अन् बायको माहेरात असते !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t19117/msg56122/#msg56122

घायाळ


घायाळ

किती अजुन छळणार
केवळ तू नजरेने?
आधीच घायाळ केलास
कलेजा तू नजरेने !

© शिव 🎭

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

कंठ

कंठ

सुमधुर आधीच तो, आषाढात गायलेला
रानात कंठ झर्‍याचा, अाता दाटू लागला!

=शिव