बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

मला_वाटते... जबाबदाऱ्या

जबाबदाऱ्या

खांद्यावर हात ठेवणारं घरात कोणी वडिलधारं  नसेल तर आपण फार मोठं, पोक्त झालोत असं उगाच जाणवतं. मग जेव्हा वास्तविक जीवना पेक्षा व्यवहारीक जीवनातल्या लहान मोठ्या सर्व जबाबदाऱ्या अंगावर येउ लागतात तेव्हा ते हळूहळू पटूही लागतं, आणि पुढे पुढे प्रयत्न करून त्या जबाबदाऱ्या निभावल्या पण जातात, परंतु खरी कसोटी तेंव्हा लागते जेव्हा एखादा महत्त्वाचा वा मोठा निर्णय घ्यावा लागतो.

काही जणांना वाटेल त्यात काय नविन आहे? सगळ्यांनाच तर यातून जावं लागतं., बरोबर आहे ते, अशावेळी परीस्थिती तुम्हाला आपोआप बळ व बुद्धी देते, आणि त्यातूनही तुमची वेळ चांगली असेल तर अवघड जबाबदारी सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडली जाते, निभावली जाते आणि त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढतो, जरी काही चुकीचं घडलंच तर कैक प्रकारचं नुकसानही वाट्याला येतं, तरीही त्यातुनही एक नवा धडा शिकायला मिळतो, नवा अनुभव मिळतो मोल देवून घेतलेला.

काहिंच्या बाबतीत या जबादाऱ्या फार लवकरच त्यांच्या खांद्यावर पडतात आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे त्या निभावल्या सुद्धा जातात तसेच काही वेळा फार मोठा अनुभव पण देऊन जातात. असे लोक नंतर पुढील आयुष्यात सहसा धीटपणे व आत्मविश्वासाने जीवन जगतात व आपल्या क्षेत्रात नावलौकीक प्राप्त करून यशस्वी होतात.

#मला वाटते...शिवाजी सांगळे©
३२/१४-११--२०१७ 🦋

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा