शुक्रवार, ३ जून, २०१६

दे धक्का...! जळती काडी?


दे धक्का...!

जळती काडी?

पुलगांव पाठोपाठ भिवंडी, नंतर
आता कुलाबा, त्यापुर्वी डोंबिवली!
दुष्काळानं आधीच तापल्या रानी
कशानं हो राज्यभर आग पेटली?

राजकारणातील एक एक ज्वाला
पुन्हा नव्यानं पेटून उठू लागली!
खरचं लागल्या सार्‍या आगी ?
का जळती काडी कुणी टाकली?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24025/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा