रविवार, ९ जुलै, २०१७

भुलावे

भुलावे

सारेच का ते भुलावे खरे होते
ईशारे नजरेतील का खरे होते

फुलाशी थांबणे दवाचे निवांत
दाखविण्या प्रेम एवढे पुरे होते

घरगंळला न थांबला कळी संगे
एवढेच आयुष्य दवाचे खरे होते

वर्णावे किती ते गोडवे पात्यांचे
चुंबाया धरणीस बहाणे बरे होते

दशा सर्वात ती झाडाची वेगळी
पानांतुन अश्रु ढाळीत सारे होते

वाजविणे शिळ चौफेर मोकळी
एकटेच तरबेज येथले वारे होते

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28996/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा