शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

बगल

बगल

उचकी लागली आणि जाग आली
पाहिलं न् तु अॉन लाईन दिसली ! 

झोपलेला होता नवरा तोवर  
सासुची तेवढ्यात झोप उडाली !

काय राव झाली भलतीच गोची 
बायकोचीपण इथ झोप उघडली !

न आलेलं नळाला पाणी, आणि
उकळत्या दूधावर चर्चा झाली !

विषय काय घ्यावा हो रम्य प्रहरी
म्हणता, चर्चेला त्या बगलच दिली !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t31214/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा