बुधवार, २२ मे, २०२४

हशील



























हशील

बरंच काही हरवलंय काळाच्या ओघात
किती छान होत नाही का नातं लोकात !

खुप काही घडायचं, तरीही पडत नव्हत
तेव्हा, उगाचच कुणी कुणाच्या मध्यात !

लोकांना वेळ अन् रहाणी साधीच होती
पगार कमी होता, पण रहायचे झोकात !

ठिक आहे, वेळ सरली, काळ बदलला
दिसत नाही पुर्वीचा, एकोपा जगण्यात !

तंत्रज्ञान बदलले, विचार सुद्धा बदलले
हशील आहे का काही विरोध करण्यात?

https://marathikavita.co.in/index.php?topic=45260.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा