रविवार, ६ एप्रिल, २०२५

कथा

कथा 

सांगे एक कथा गळून पडलेलं पान 
ठरव तू, खरं खोटं मानायचं ते मान 

प्रत्येका वाट्याला,येतात सुखदुःख 
मिळतो तसाच कधी मान अपमान 

नाते फांदीशी,अन् लोकांशी काय?
जोवर हिरवेपण देठात, तोवर शान

एखाद दिवशी, काही तरी बिनसतं 
शुष्कता येताच,फांदी काढते ध्यान

झोके अन् हेलकावे, घेत वाऱ्यावर 
मिसळून मातीत, होते मातीसमान 

https://marathikavita.co.in/index.php?topic=53901.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा