बुधवार, २३ एप्रिल, २०२५

अदृश्य प्रश्न

अदृश्य प्रश्न

अदृश्य ती गोष्ट मौनातून बोलते 
अतिरेकातून अत्याचार घडविते,
द्वेष अन् चिथावणीवरुन उगाच 
सर्वसामान्य जनतेचा बळी घेते!

सर्वच गोष्टीचे राजकारण येथे
प्रत्येकजण शंकास्पद वागतो,
आज देशाच्या सद्य स्थितीचा
कोण प्रामाणिक विचार करतो?

अन्याय, अत्याचार हा असला 
अजून कुठवर सहन करणार? 
सुधाणाऱ्या देशगाड्यास इथले 
देशद्रोही कितपत साथ देणार?

https://marathikavita.co.in/index.php?topic=55038.0

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा