खरंच मन गुंतले या आभासी दुनियेत
काय आहे वास्तवात नाही ध्यानी येत
इन्स्टा,फेबु, वॉअँ आणि एक्स सोडून
लोकांना आजकाल नाही जगता येत
पूर्वी बरं होतं, होते खेळ मैदानी खुप
कोणा एकात,लोक जमवून होते घेत
कामकाज पण आजकाल बैठं झालं
कॉर्पोरेट चालतं आभासी सोबत थेट
दुखून येतात बोटं मान,खांदे न् कंबर
बसून बसून, हळूहळू सुटू लागतं पोट
धरावी का सोडावी आभासी दुनिया?
फैसला काही पक्का आज नाही होत
https://marathikavita.co.in/index.php?topic=53537.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा