बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

वादग्रस्त प्रश्न

वादग्रस्त प्रश्न

राज्यात कबुतरां वरून वाद
राजधानीत कुत्र्यांवरून वाद!
प्रत्येकासच मानले जरी खरे
तरीही कसा मिटणार हा वाद?

नक्की काहीतरी डाव असावा
कुणीतरी वेगळी खेळी खळते
दडवायला का चुका झालेल्या
मुद्दाम का नवे विषय उचकवते?

सुशिक्षित अन् संयमी परंपरेत 
सुड, स्वार्थाचे राजकारण का!
भविष्य असल्या, या कृत्यांना 
खरोखर विसरून जाईल का?

https://marathikavita.co.in/index.php?topic=62511.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा