मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

सी सी टीव्ही व लक्ष

सी सी टीव्ही व लक्ष

     किती चमत्कारीक आहोत ना आपण? स्व:ताच स्व:तावर नजर ठेवु लागलोत, हल्ली पहाव तीथं सी सी टीव्ही लावतो, रेल्वे स्टेशन, बजार, चौक, आँफिस, राहतो त्या ईमारतीत वगैरे सार्वजनिक ठिकाणी समजु शकतो, पण काही लोक स्व:ताच्या घरात सुध्दा सी सी टीव्ही लावून घेतात, याaaadcला काय म्हणायचं? सुबत्ता कि एकदुसर्‍या बद्लचा अविश्वास?

     तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे व गरज म्हणुन खरं तर सी सी टीव्हीची संकल्पना पाश्चात्य देशात सुरू झाली व जगभर पसरली, तशी हि सोय चांगलीच आहे, एखाद्या अपराधिक घटने नंतर याचा उपयोग करून अपराधी पकडले गेलेले आहेत, व न्यायदानात पण याचा उपयोग होतच आहे. आज बर्‍याच क्षेत्रात त्याचा वापर सोयी नुसार होत व वाढत गेला. परस्पराच्या विश्वासावर अवलंबुन असणारे आता सी सी टीव्हीच्या फुटेजवर विश्वास ठेवु लागलेत.

     हल्ली एकत्र कुटुंब पध्दती तशी बाद झाल्यातच जमा आहे, आटोपशीर कुटुंब संज्ञेतुन हम तीन हाच मंत्र जपला जातोय, लोकसंख्येचा विचार करता याचा किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय आहे, कारण हम तीन करून सुध्दा लोकसंख्या फुगतच चालली आहे, खैर, हम तीनच्या या काळात आई वडील दोघं कामानिमित्त बाहेर, घरी मुलं एकट, त्याला सांभाळणारी आया वा नोकर, मग हे लोक आपल्या अपत्याशी कसे वागतात यावर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टीव्हीची मदत घेतली जाते आणि त्याचे आश्चर्यकारक निकाल काही बाबतीत दिसुन आले.

     माणसाच्या स्वभावाचे, वागणुकिचे विविध पैलू दिसुन आले त्यात खास करून अपराधिक बबीच जास्त समोर आल्या, लहाणग्याचे दुध पिण्या पासुन ते त्याला अमानुष मारहाण करण्यापर्यंतचे विविध फुटेज समोर आलेले आहेत. या व्यतिरीक्त घरमालकाच्या गैरहजेरीत चोर्‍या करणं, चोरून खाणं इत्यादि घटना सुध्दा समोर आल्या आहेत.

     पुर्वी बरं होतं एकत्र कुटुंबात बरीच माणसं असायची, घरातील कर्त्या पुरूषावर घरी लक्ष ठेवण्यासाठी एवढा ताण येत नसे, कारण घरातील ईतर सदस्य ते काम व्यवस्थित करीत असत, मुलं अभ्यास करतात कि नाही? शेजारी पाजारी जातात का? कुणशी बोलतात? बाहेरील परके लोक, फेरीवाले वगैरे आजुबाजुला फिरताहेत का?इत्यादि बाबींवर घरातल्यांच, शेजारपाजार्‍यांच लक्ष रहायचं, एखाद्याने काही चुक केली वा अन्य काही घटना घडलीच तर त्या वेळेस हस्तक्षेप करून समोरच्याला दटावणी देत असतं, वेळ प्रसंगी मुलांवर रागावत सुद्धा असतं आणि त्या रागावण्याचा बाउ पालक कधी करीत नसत. अश्या वातावरणामुळे अपराधांच्या घटना कमी होत्या, बलात्कारा सारख्या गोष्टी तर क्वचित ऐकु येत असतं.

     एकंदरीत समाज व्यवस्था अशी होती कि सार्‍या परिसरात चालते बोलते सी.सी. टीव्ही होते, या उप्पर आपसातलं नेटवर्क एवढं स्ट्राँग असायचं कि बातमी वार्‍या सारखी पसरायची, तेही वाँट्स अँप वगैरे नसतांना. महत्वाचं म्हणजे परस्परांबद्ल विश्वास व आपलेपणा होता आणि त्या  आपलेपणाणुळे येणारे राग, लोभ, द्वेष वगैरे संमिश्र भावना पण असायच्या, परंतु या उलट परिस्थिती आज दिसते, फ्लँट कल्चर मुळे अपवादात्मक स्थितीत शेजारी वा बिल्डिंग मधे वर खाली काय घडतय वा घडलंय याचा कुणाला पत्ता नसतो. या मुळे अपराधी माणसिकता असणारे याचा सारा विचार करून अपराध करीत असतात, थोड्याश्या पैशांसाठी वयस्कर व्यक्ती, एकटी दुकटी महिला पाहून चोर्‍या करण्या पासुन ते खुना सारखे गुन्हे करतात. विकृत मानसिकता असलेले लोक तर कुठल्याही वयाच्या स्त्रीवर बलात्कार करतात, अगदि दिड वर्षाच्या बालिके पासुन ते सत्तरीतल्या आजींचा विचार सुध्दा या नराधमांच्या मनात येत नाही, तसं तर बलात्कार वाईटच, तरीही असे अपराधी पुराव्या अभावी मोकळे राहतात आणि दिवसागणिक या प्रकारच्या घटाना वाढतच आहेत. कुणाला दोषी ठरवायचं? बदललेल्या समाज व्यवस्थेला कि योग्य संस्कारा अभावी वाढत चाललेल्या विकृत, गुन्हेगारी प्रवृत्तीला?

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25570/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा