बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

दोष द्यावा कुणा?


दोष द्यावा कुणा?

भासात जगणे म्हणावे
कि जगण्याचा हा भास?
अाश्रित असा का कुणी
परकाच भरवितसे घास !

निरागस काही, काहि
शांत शांत अतिव आत,
नजरेत पाझरे भाव तिव्र
जेंव्हा हृदयी फुटे अकांत !

उरे ना भान जगण्याचे
मरण, ते ही सुधरेना
जन्म, का व्हावा गुन्हा?
दोष द्यावा तो कुणा ?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t25968/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा