प्रेम कार्य
आठवण आभास देते, स्पर्श नाही
व्याकूळतेत या, कशाचा हर्ष नाही
उरतो केवळ खेळ एक विचारांचा
त्यातून काही निघत निष्कर्ष नाही
जगा लेखी प्रेम कोणते कार्य मोठे
मानावे का श्रेष्ठ ज्यात संघर्ष नाही
कितीक काळ घुसमटायचे अजून
झुरण्यात येथे, काही उत्कर्ष नाही
सुरवातीसच फैसला होतो मनाचा
उगाच फुकटची चर्चा-विमर्ष नाही
लोटला काळ, होत्या अमर जोड्या
म्हणे शिव आज कुणी आदर्श नाही
https://marathikavita.co.in/index.php?topic=53344.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा