भावनांच्या भरात
काहीबाही घडतं भावनांच्या भरात
ठरवूनही कैकदा येत नाही ध्यानात
कित्येकदा असतात शुल्लक घटना
तरीही, विषय वाढून जातो खोलात
ठरवतात नेहमी पुन्हा नको व्हायला
नाही म्हणूनही, वाद वारंवार होतात
होतो गैरसमज न् अकारण नाराजी
उगाच मन कुढते, मनातल्या मनात
होवो न वेडेवाकडे भावनेच्या भरात
दिलजमाई होता हे दोघेही ठरवतात
https://marathikavita.co.in/index.php?topic=53222.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

.jpg)
.jpg)


.jpg)


