तु एक मीही एक दोघं प्रवासी एका वाटेचे
माहीत नाही कुणाला गंतव्य कुठे कोणाचे
वाट सारी चाळलेली, तरी थोडी मळलेली
असून समांतर,तरी अंतर राहील कायमचे
लागलीच का थांबतो प्रवास खेळ इथला?
हुशारीने दरवेळी आपले पाऊल टाकायचे
स्पर्धेच्या युगात नित्य रे अडथळे नियमांचे
पाळून अटी,शर्ती सर्व नेमके उत्तर द्यायचे
डाव प्रतीडाव खेळू दे, भले कुणी कितीही
तत्त्व प्रामाणिकतेचे, स्वतः नाही सोडायचे
म्हणो कुणी आहे कठीण वाटचाल इथली
लढून हिमतीने, तु ध्येय मनातले गाठायचे
https://marathikavita.co.in/index.php?topic=57119.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा