घास
शहरात माणसांच्या आजकाल
कोल्हे,तरस,बिबटे हल्ले करु लागले,
आधीच इकडे काय कमी होते?
मुळ निवासी पुन्हा इथे परतू लागले!
आता दोष का द्यावा त्यांना?
आम्हीच केला घात,ऱ्हास निसर्गाचा,
सोडून मर्यादा, सीमा आपल्या
मनसोक्त घेतला आहे घास जंगलाचा!
https://marathikavita.co.in/index.php?topic=69929.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९









