शनिवार, १३ मे, २०१७

वाव

वाव

सार्‍याच आयुधांचे, मोठेच दुःख आहे
आप्तच आज सारे, लावीत धार आहे

स्वकीय मात्र येथे, सोडीत तीर आला
ईमान सोडलेल्या, हातात जोश आहे

स्वार्थात गुंतलेल्यां, वास्तव भान यावेे
तोडून पाश सारे, जाणे नक्कीच आहे

काही इथून न्यावे, कोणा कसे जमावे
खालीच हात येणेे, जाणे तसेच आहे

येथून सोबतीला, कोणीच येत नाही
स्मृतीत राहण्याते, सार्‍यांस वाव आहे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t28545/msg68243/#msg68243

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा