शनिवार, ६ मे, २०१७

स्मरण


स्मरण

ओंजारल गोंजारलंं किती
शय्येवरी खुपदा कुरवाळलं
दुःखी कष्टी झालोच केंव्हा
घेवुन उरी स्वतःला सावरलं

ढाळलीत आसवे कितीदा
चेहर्‍यास तुझ्यात लपविलं
चिडलो जेव्हा कधी कधी
बेदिक्कत फेकूनही मारलं

लोकां नको ताणाया अती
कसं आपलं नातं जुळलं ?
स्मरा कि जरा बारकाईनं
स्मरण उशीचं आता झालं?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t28479/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा