रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

खता ०९११२०२५ yq १३:०३:०७























खता 

एक लड़ाई ख़ुद की ख़ातिर, लडने चलें
भीड़ भरे इस जहाँमें ख़ुद को ढूंढने चलें 

डूबता है अक्सर,जिस्म ये गहरे पानी में
बेझिझक आज हम दिलको डूबाने चलें

फैली है नफरत,चारों ओर गौर से देखो
खता जरा सी, मोहब्बत में भिगोने चलें

नादान, ना-समझ दिल यह एक बेचारा
देखकर उसे,ख़ुदगर्ज़ उससे खेलने चलें

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

घोटाळे


घोटाळे

कधी सिंचन, कधी जमीन
आवळले जाणार चौकशीत गळे?

सारेच रखवालदार येथले
तहान भागवतांना गिळतात तळे!

बदलेल राजकारण म्हणता
सुकून जातात हो सामान्यांचे गळे,

सर्व कायदे नियम असता 
थांबणार आहेत का कधी घोटाळे?

https://marathikavita.co.in/index.php?topic=70167.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

फायद्यात यावे


फायद्यात यावे 

पाहिलेले एक स्वप्न केंव्हातरी सत्यात यावे 
शब्द भारदस्त चांगले माझ्या भात्यात यावे

लिहितोय हो, आजवर मी रोज काहीबाही 
गुपचूप कोणते तरी अनुदान खात्यात यावे 

घडताना उगा घटना विचित्र काही भोवती  
वाटेल का कधी कुणा फुकट गोत्यात यावे 

अशीच चालते,जगरहाटी आजकाल भावा 
नाही कुणी आप्त कुणाचे,का नात्यात यावे

सोसलाय घाटा बराचसा वावरताना इकडे
वाटते फिरून पुन्हा एकदा फायद्यात यावे 

https://marathikavita.co.in/index.php?topic=70081.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

नजारे किनारे























नजारे किनारे

नकोत हे नजारे नको चंद्र तारे
भावतात मला मोकळे किनारे

पायी खेळते मुक्त रेशीम वाळू 
मृदुल भास, अल्हाददायी सारे 

मंद स्पर्शातून, हळूवार छेडती
स्वरात वाहणारे, खोडील वारे

विसावा हा आतूरल्या जीवांचा 
भेटती येथे कैक अधीर बिचारे 

येथेच भेटते, क्षितिज गगनाला 
हवेत कशाला, डोईवरुन पहारे

आवडती मला, सागरी किनारे
नकोत चंद्र तारे, नको ते नजारे

https://marathikavita.co.in/index.php?topic=70004.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

घास























घास

शहरात माणसांच्या आजकाल 
कोल्हे,तरस,बिबटे हल्ले करु लागले,

आधीच इकडे काय कमी होते?
मुळ निवासी पुन्हा इथे परतू लागले!

आता दोष का द्यावा त्यांना?
आम्हीच केला घात,ऱ्हास निसर्गाचा,

सोडून मर्यादा, सीमा आपल्या
मनसोक्त घेतला आहे घास जंगलाचा!

https://marathikavita.co.in/index.php?topic=69929.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

जा रे जा रे पावसा

जा रे जा रे पावसा

जा रे जा रे पावसा,
शेतकरी भरतोय रे उसासा!
तु पक्का वागतो खोटा,
चिटींग करून पडतो मोठा!

थांब ग थांब गं सरी,
भरले बघ पाणी घरीदारी !
तरीही आलीस धावून,
गेले शेत, गुरं गेली वाहून !

अचानक पडतो रिमझिम,
होतात सारे ओलेचिंब!
मधेच पडतो मुसळधार'
पुरताच उडतो हाहाकर!

कारे पडलास अवकाळी,
सगळीकडे साचलीत तळी!
जावसं आता तू माघारी,
लोकांना घेऊ दे श्वास तरी!

https://marathikavita.co.in/index.php?topic=69526.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

मी बरा एकटा

मी बरा एकटा

म्हणावे का आता! फार काही नको? 
प्रतिस्पर्धी सोडा, सोबती? तोही नको! 

धावण्याच्या स्पर्धेत थांबा नाही कुठे
प्रवास तर सुरु झाला उगा घाई नको! 

मी बरा एकटा, होऊदे मला सर्वोच्च
त्यागी भला,भोवती कुणी मोही नको! 

प्राप्त व्हावे मला, ते सर्वश्रेष्ठ असावे
खैरात तर नाहीच,न् काहीबाही नको! 

होणार नसेल साध्य काही एकट्याने
धडपडण्यात इथे माझ्या, मीही नको!

https://marathikavita.co.in/index.php?topic=69322.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

क्षण क्षण

क्षण क्षण

चांगला क्षण, वाईट क्षण
येतो क्षण अन् जातो क्षण
तुम्ही कोणता हो निवडता क्षण?
क्षणा क्षणातलं हे आयुष्य
किती क्षण, जगतो खरे आपण?

हसरा क्षण, रडका क्षण
प्रत्येकाचा असतो दुखरा क्षण
समजून तुम्ही घेता कोणता क्षण?
क्षणभंगुर सारं जगतो मी
वाट्याचं तुमच्या घ्या चांगल जगून!

खरा क्षण नी खोटा क्षण
पावलोपावली तो दिसता क्षण
काय म्हणते मन? आनुभवता क्षण?
मी तर होतो सुन्न खुपदा
तुम्ही पण घ्या, योग्य निवडून क्षण!

ध्यानात क्षण,मनात क्षण
कर्मकांडात पण शोधतो क्षण
स्मरतो का समईतचा जळता क्षण?
सारे जगतो श्वासातला क्षण
खरोखर पहा एकदा विचार करून!

https://marathikavita.co.in/index.php?topic=69039.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

कलाकार २६१०२०२५ yq १७:१०:२५

कलाकार

तोवर हे असेच चालू राहणार...
जोवर, तिसरी घंटा वाजणार...

रंगमंचावरील ध्वनी प्रकाशात
कलाकार स्वतःला विसरणार...

चेहऱ्यावर, रंग लावल्यानंतर 
खुशाल स्वतःस झोकून देणार...

चाखतांना अभिनयाची गोडी
प्रेक्षकांना देखील तृप्त करणार...

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

मोहब्बत

मोहब्बत

अब कमी नहीं खलती आदत सी हो गई हैं
प्यार व्यार,दोस्ती अब दहशत सी हो गई हैं

जब से संभाला खुद को,होकर जुदा तुमसे
ज़िन्दगी को अब बडी फुरसत सी हो गई हैं

यारी जबसे गहरी हुयी सोचकर किताबों से 
जानने ईन्सानों को सहुलियत सी हो गई हैं

दिखाई हर राह ने नयी मंजिल चलते चलते
माना उम्र के मोड पर खिदमत सी हो गई हैं

बोझ नहीं लगता इस विराने मे अकेले होते
शायद अकेलेपन से, मोहब्बत सी हो गई हैं

https://marathikavita.co.in/index.php?topic=68756.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

लत २११०२०२५ yq १२:१४:५०

लत

मोबाइल की लत, ऐसी बनी है हालत
के हरएक झुककर उसमें होता हैं रत

महलों में रहें चाहे कोई गलीयों में रहें
बिगडाई उसने तो यहां सबकी आदत

भरपूर डेटा मिले, सारा कामकाज चलें
अकेले पडें, कौन बेकार किससे बोलें

अपनेआपमें सारी खुशियां बटोरते रहें
बैठते हैं, खुदके मुह को लगाकर तालें

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

सुराज्याची हाळी १९१०२०२५ yq १६:४९:५२

सुराज्याची हाळी

व्हावी दिन दिन दिवाळी रोज रोज 
अन् सुखांची मांदियाळी रोज रोज

बरसात आनंदाची होऊदे सर्वोपरि
अन् भय दु:खाची,होळी रोज रोज

एकएक फटाका वाजत उंच जाता 
तमो गगनी, तेज उजळी रोज रोज

मिष्टान्न,फराळ गोड लाभो सर्वांसी 
नी गरीबा पोटभर थाळी रोज रोज 

अंत नसावा येथे कुणाच्या सुखाला
सुराज्याची गुंजावी हाळी रोज रोज 

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

लुटालूट

लुटालूट

एकाच माळेचे सगळे हे मणी
उखाळ्यापाखाळ्या बघा काढू लागले,
विसरून स्वतःची पुर्व कर्मे
वैयक्तिक गंभीर आरोप करीत सुटले!

राजकारणाच्या स्वच्छ धंद्यात
कुणाशी कायम शत्रुत्व असते कुठले?
काही दिवस तुझं माझं करून
स्वार्थापोटी युती करायची, हे असले!

जमेल तसे, अन् जमेल तेवढे
सत्तेचे खरे सुख यांनी उपभोगून घेतले,
जनहित म्हणत,दिशाभूल करुन
आपल्याच पोळीवर तुप ओढून लुटले!

https://marathikavita.co.in/index.php?topic=66925.new#new
 
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

शोधात स्वतःच्या ०११०२०२५ yq १५:२५:०५

शोधात स्वतःच्या

स्वतःच्या शोधात कुठवर आता फिरायचे 
कोण आपले, कोण परके कसे शोधायचे

आहे कुठे वेळ एवढा, सांभाळण्या नाती
खाद्यासाठी दिवसभर फडफडत रहायचे

वाट्याला जे आले, ते समजून मधूर सारे
पंखावरले वर्ख,सह्रदयांस मुक्त वाटायचे

अल्पजीवी नाते, अल्प जीवन आहे तरी
घेत स्वानंद, मनमुराद चौफेर बागडायचे

कोण आपले, कोण परके कसे शोधायचे
स्वतःच्या शोधात कुठवर आता फिरायचे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

लाटेचे विरहगीत

लाटेचे विरहगीत

ओझरता काय होतो किनाऱ्यास स्पर्श लाटेचा
माघारी जाता म्हणते हा योग आपल्या भेटीचा

मलाही वाटते खुपदा थांबावे तुझ्या सोबतीला
तटस्थ ठाम तु,तोडू कसा नियम हा प्राक्तनाचा

अनिर्बंध धावते मी, खळाळून आशेने भेटीच्या
भेटता क्षणीच, जीव होतो पाणी पाणी मनाचा

सारेच येथले अनाकलनीय काही कळत नाही
परिस्थितीत साऱ्या कुणी दोष कुणास द्यायचा

तरी बरं,सोबती तुझ्या असतात बरीच जोडपी
ठरवते पाहून त्यांना,विरह आपला विसरायचा

अनोखा संसार मांडला नियतीने जगी आपला
कळेना टाळायचा कसा अटळ भोग जीवनाचा

https://marathikavita.co.in/index.php?topic=66530.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

व्वाह रे जिंदगी

व्वाह रे जिंदगी

खुप रहस्ये घेऊन जेव्हा असते जिंदगी
मनातल्या मनामधे तेव्हा हसते जिंदगी

कमतरता नाही भोवती येथे पारंगतांची
अमिषांना त्यांच्या सहज फसते जिंदगी

होऊन करता चांगुलपणा, अंगाशी येतो
धरून डोके आपलेच मग बसते जिंदगी

धावते,थकते रात्रंदिन न् लगेच जाणवते
खिजगणतीत कुणाच्याच नसते जिंदगी

वारंवार येता वाट्याला, सुन्न हताशपणा
स्वतःलाच रे  'शिव' सतत डसते जिंदगी

https://marathikavita.co.in/index.php?topic=66467.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

रंग स्वप्न

रंग स्वप्न

डोळ्यात स्वप्न असतात...घेऊन कैक रंग 
उतरतात सत्यात काही,होतात काही भंग

सांडूनि रंग वर्ख..उरतात कित्येक माघारी
पाठलाग जीवनाचा करतात सारेच हे रंग

मिसळतात परस्परात मोजके ते पारदर्शी 
काहींच्या वाट्या असते, होणे स्वतःत दंग

त्यातल्यात्यात बरे स्वप्नां पुरताच खेळ हा 
सत्यात येता येता, टिकतील का यांचे ढंग

वाटते एक भिती अनामिक..रोज जागता 
अप्रत्यक्षपणे त्या, लागला माणसांचा संग

https://marathikavita.co.in/index.php?topic=65694.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

कारण

कारण
  

आनंदी व्हायला कारण कुठे लागते!
नाराज व्हायला कारण कुठे लागते!

झुळूक वाऱ्याची हळू स्पर्शून जाता 
कुणाला त्रासदायक का कुठे वाटते!

माझे तुझे अन् तुझे माझे, करतांना 
सौख्य खरे,अंतर्मनाला कुठे भासते?

अनिश्चित जीवन अल्पकाळ येथले
जाणण्या रात्रंदिन कुठे कुठे जागते!

म्हणा,गेला तो सुखाने, क्षण आला 
कवटाळून व्यथा,सुख कुठे लाभते!

https://marathikavita.co.in/index.php?topic=65304.new#new


©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मतला शेर १७०९२०२५ ya १४:०५:३०

मतला शेर

ये दुनिया किसी की सगी तो नहीं है
बेवजह तारीफ कहीं ठगी तो नहीं है

पहचान से सिर्फ करीब वो इतने आयें
और पता चला हमारी सखी तो नहीं है

चोंटें लगती है अक्सर कडवी बातों से
फिर पुछते है दिल को लगी तो नहीं है

अचरज है खैरात देता लालची देखना 
असल में इतना बडा त्यागी तो नहीं है

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

भास गोजिरा

भास गोजिरा

सखये भास तुझे भोवती का सारखे फिरावे
सावलीत न् कधी जळी प्रतिबिंबात दिसावे

बावरते वेळोवेळी, जसे वाऱ्यावरी फुल वेडे
बैचेन मन माझे का म्हणे भ्रमरा सम वागावे

छाया, पडछाया, अचानक कवडसे बिलोरी
धरु पाहता हाती सारेच का नजरेतून सुटावे

ओढ वेड्या मनाची, माझ्या आगळी वेगळी
जाणून सत्य ते, तुला सहज का न उमजावे

ठेवावी कुठवर मी आशा, भेट होण्या तुझी
विचार करता हसू, न् प्रत्यक्षात मी फसावे?

किती काळ जोपासू,भास हा मनी गोजिरा
भेट नसता समक्ष,जगण्या त्राण कसे उरावे

https://marathikavita.co.in/index.php?topic=64978.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

जुने संदेश १२०९२०२५ yq १५:१५:२५

जुने संदेश

पुन्हा आज पाहिले संदेश जुने तीचे 
उमगले गुण काही अधिक उणे तीचे 

आयुष्य का जगता येते, स्वप्नात येथे
सलायचे सत्यास खाली पाहणे तीचे 

असतात काही इच्छा आकांक्षा मनी
चुक होते एकांगी विचार करणे तीचे 

करावी मान्य परिस्थिती सत्य येथली
खरे का म्हणू भुतकाळात रमणे तीचे

नाही ठेवायचे बोट, 'ती' म्हणून मला 
संदर्भात होते, खुप हट्टी वागणे तीचे 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

पथदिप

पथदिप

देवोन दाखले, संताचे ते थोर!
वाटतो विचार, ज्ञानी श्रेष्ठ!!१!!

चरितार्था साठी, वाचताती पोथी!
कधी स्वार्था पोटी, भोंदु जनां!!२!!

मोह विसरण्या, स्वतः पुढारावे!
पथदिप व्हावे, बहुजणां!!३!!

कलीयुगी पुरे, नित्य ज्ञान आम्हा!
नामा,तुका,ज्ञाना, स्मरणांती!!४!!

जावोनी पल्याड, संताच्याही थेट!
नव ज्ञानामृत, द्यावे बुवा!!५!!

आधुनिक संता, करीतो विनंती!
साक्षात्कार अंती, लाभो शिवा!!६!!


https://marathikavita.co.in/index.php?topic=22318.msg60495#msg60495

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

रात और मै

रात और मै

तनहाई को, गले से लगाया आज हमने
रात को आसुओं से सजाया आज हमने

बातें बहोतसी हुई दरमियान गमे दर्द की
जैसे मामला दिल का उठाया आज हमने

काफी देर तक, रोती रही रात लिपटकर
बडी मोहब्बत से,उसे मनाया आज हमने

फसाने कुछ और चलते हमारे सेहर तक
कहकर फिर मिलेंगे, सुलाया आज हमने

https://marathikavita.co.in/index.php?topic=63931.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

सिग्नल २५०८२०२५ १२:२५:०७

सिग्नल 🚸

एक प्रश्नचिन्ह लाल सिग्नल का
जबरन ठहरना पडता है 
ज़िन्दगी के  सवाल पर...

जगती है तभी यकायक 
आशा की गेरुई किरण, और
हम, तैयार होते हैं
सवरते है स्वयं को...

फिर शुरू होती है हरी दौड, 
रफ्तार में...अगले सिग्नल तक
अक्सर होतें है, एक पडाव
गंतव्य तक कि यात्रा मे...

और क्या लिखें?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

स्वप्नरंजन २००८२०२५ yq १५:५२:४५


स्वप्नरंजन

डोळ्यात दाटे तुझे स्वप्न आता 
तुच दिसतेस रात्रंदिनी येताजाता 

जादुगरी कसली ही जीवघेणी
सुचेना कामधंदा, तुझी याद येता 

वेडेपणा केवढा माझ्या मनाचा
गडबडतो वास्तवात समोर तू येता 

धीट,अल्लड काय म्हणावे तूला
बोलतेस छान जराही न डगमगता 

हवासा खेळ हा सारा वाटे बरा
स्वप्नरंजन केवढे मनाचे पहा आता 

भास, आभास मात्र हे सगळे
दाटती डोळ्यात तूच स्वप्नात येता 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

पाऊस असा झणीं आला

पाऊस असा झणीं आला

पाऊस असा झनी आला पाऊस असा झनी आला
पाऊस असा झणीं आला पाऊस असा झणीं आला

नव छत्र्यांचे, नव रेनकोटचे
नव छत्र्यांचे, नव रेनकोटचे नवरंग घेउनी आला!
पाऊस असा झणीं आला पाऊस असा झणीं आला

छत छत अन् डोईवरचे 
छत छत अन् डोईवरचे पत्रेही वाजवित आला!
पाऊस असा झणीं आला पाऊस असा झणीं आला

ओहळ नाले, गल्ली गटारे 
ओहळ नाले, गल्ली गटारे, तुडुंब भरवित आला!
पाऊस असा झणीं आला पाऊस असा झणीं आला

गाड्या बंद, वाहतूक मंद 
गाड्या बंद, वाहतूक मंद, धंदे ठप्प करता झाला!
पाऊस असा झणीं आला पाऊस असा झणीं आला

https://marathikavita.co.in/index.php?topic=63042.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

असेही स्वातंत्र्य (ट्राफिक ज्याम)

 असेही स्वातंत्र्य (ट्राफिक ज्याम)








            काही कारणास्तव कधी सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील प्रवास करावा लागतो, मान्य प्रत्येकाला काही तरी काम असावे, पण रस्त्यावर आपण आपली गाडी घेऊन आल्यावर काही नियम, शिस्त पाळावी लागते. एकेरी वाहतूक सुरू असताना आपण सुद्धा निमूटपणे एक रांगेत राहून समोरील व अन्य वाहनांना अडचण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी, पण आमच्या कडून तेच होत नाही.

            पटकन पुढे जायच्या हेतूने प्रत्येक आगावू वाहन धारक घाई करतो, त्यातच कहर म्हणजे अँडव्हेंचर स्पोर्ट बायकर्स, जाडजूड टायरच्या बाईक घेऊन, भयानक आवाज करीत फिरायला निघतात, मधे मधे अन्य दुचाकीस्वार भलीमोठी कसरत करीत, गँप शोधून पुढे पुढे जायचा प्रयत्न करतात, प्रसंगी धडपडतात, वाहन छोटे, मोठे कोणतेही असो, घाट रस्त्यावर मात्र भल्याभल्यांची भंबेरी उडते, कधी गाडी गरम होऊन पुढे जात नाही, चढणीला मागे सरकण्याची भिती वगैरे सतत मनात राहते. बाईक स्लीप होणे तर नित्याचे.

            अरे, निघा ना फिरायला, आपली कामं करायला पण रस्त्यावर थोडा तरी civic sense वापरा. मलाच पुढे, अगोदर जायचे म्हणून दूसरी, तिसरी रांग करून संपूर्ण रस्ता आडवायचा, समोरच्या वाहनाला न सरकायला, न यायला जायला वाट, परंतु रहदारीची मात्र पुरती वाट लागते. त्यासोबत अप्रत्यक्षपणे वेळ, पैसा आणि इंधनाची हानी होत राहते, वर होणारा मनस्ताप वेगळाच.

            आपण नेहमी, प्रशासन, पोलीस यंत्रणांना दोषी ठरवतो, पण स्वतः काय करतो ते परस्पर विसरून जातो. मला वाटतं आपण ५०% जरी शिस्त, संयम पाळला तर बराच मोठा फायदा, सुविधा सर्वांना मिळू शकते.

पहा एकदा विचार करून...


~शिवाजी सांगळे

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

वादग्रस्त प्रश्न

वादग्रस्त प्रश्न

राज्यात कबुतरां वरून वाद
राजधानीत कुत्र्यांवरून वाद!
प्रत्येकासच मानले जरी खरे
तरीही कसा मिटणार हा वाद?

नक्की काहीतरी डाव असावा
कुणीतरी वेगळी खेळी खळते
दडवायला का चुका झालेल्या
मुद्दाम का नवे विषय उचकवते?

सुशिक्षित अन् संयमी परंपरेत 
सुड, स्वार्थाचे राजकारण का!
भविष्य असल्या, या कृत्यांना 
खरोखर विसरून जाईल का?

https://marathikavita.co.in/index.php?topic=62511.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

शाश्वत

शाश्वत

शोध घेता शाश्वताचा दु:खच गवसले मला
सुख हवे पुन्हा,भोगणारे म्हणू लागले मला

तक्रार गोठल्या बर्फास, टोचणाऱ्या सुईची
स्पर्शाने मात्र, गारठ्याचे काटे टोचले मला

कशाला हवी आणखी परीक्षा नवी विषारी
परंपरांनी जुन्या,पुन्हा खिंडीत गाठले मला

सावकाश जा तू इथून, आधीच म्हटले होते
कर्तव्यदक्ष टोळीने,होते चौकात घेरले मला

ठरविले होते टाळूया दु:खांना वारंवार जरी
सुख आगळे, भेटीत त्यांच्याच लाभले मला

नको असतो कुणासही साधा मित्र अताशा  
उगाच का सोबत्यांनी अर्ध्यात सोडले मला

https://marathikavita.co.in/index.php?topic=62363.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५

हसायला येतं ०८०८२०२५ yq १३:४१:१३

हसायला येतं

कसं काय विसरायला होतं हल्ली फार
बातमी अर्धी कुणी का देतं हल्ली फार

काय बरं होतं लिहायचं?आठवत नाय
असं विचित्र काहीतरी होतं हल्ली फार 

लक्षात ठेवतो नक्की सांगा आता जरा 
अचानक असं का बिघडतं हल्ली फार

लक्षात ठेवायचं म्हणून विसरतो सगळं
गम्मत वाटता हसायला येतं हल्ली फार 

छे, भलतंसलतं तसं तर काहीच नसावं 
वाढाया लागल वय! वाटतं हल्ली फार

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

साक्ष

साक्ष

बस एवढीच काय ती माझी कमाई आखरी
दिले घेतले जे काही त्यास साक्ष हि स्वाक्षरी 

विखुरलेत ठसे अस्पष्ट काही आसमंती येथे
तरी आहेत ठोस काही कोरलेले मना अंतरी 

सोडून कितीक द्यावे, बोलणे कुणा कुणाचे
लागतोच ना शब्द एखादा शेलका जिव्हारी 

जातो जिथे तीथे, वाटते असतो मी, एकटा
एखादी तरी असतेच, अज्ञात चिंता शेजारी 

सावल्या आठवणींच्या येता दारी मनाच्या
गुंतवून स्वतःत त्या, करतात वसूल उधारी 

https://marathikavita.co.in/index.php?topic=61550.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

गुरुवार, ३१ जुलै, २०२५

स्वातंत्र्य बंधनातले

स्वातंत्र्य बंधनातले

जीव गुदमरत आहे रे, अधांतरी 
व्याप खासा, येण्या जमिनीवरी 

कोणते आकाश येथे, जगण्याचे 
तरीही झुलतोच आहे वाऱ्यावरी 

सारेच व्यर्थ, अवडंबर शाश्वताचे 
कोण नाही, अवलंबून कुणावरी

वाटे मोहक, स्वातंत्र्य बंधनातले 
गुदमरतो श्वास बेतता जीवावरी

खेळ अवघा, विचारांचा एकल्या 
तुटते नाळ,कळते येता भानावरी

https://marathikavita.co.in/index.php?topic=61385.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २७ जुलै, २०२५

बा विठ्ठला

बा विठ्ठला

देवा तुझ्या गाभाऱ्यात हल्ली
पावसाचा होतो थेट अभिषेक,

तुच घ्यावास ठरवून बा आता
कोण खादाड येथे, कोण नेक..!

होता जलाभिषेक डोक्यावरती 
कुंठते भक्ती, भोळ्या भक्तांची,

रिकामी होते तिजोरी बघ कशी 
दुरूस्ती होताना, तुज मंदिराची..!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

भुलावा












भुलावा

"चंचल हे मन माझे" न्
भुलावा हा भवसागर रे
जाईल कुठे प्रवास हा
वेळीच आता तु सावर रे

स्वार्थी मन, दुष्ट कधी
स्व:ता पुढे, का जाईना रे
इथवर येणे,बहू जाहले
योग्य सन्मार्ग तु दाखव रे

मग्न जे अंतरजाली 
वास्तव त्यांसी दावशिल रे
क्षणभंगुर मोह माया
तीतून आता तुच सोडव रे

https://marathikavita.co.in/index.php?topic=60899.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

श्रावण आला

श्रावण आला


श्रावण आला श्रावण आला 
पालवी फुलांचा बहर आला
रांगोळी फुले दारी सजताना
व्रतवैकल्यांचा आनंद आला

श्रावण आला श्रावण आला
माहेरवाशिणींचा सण आला
झिम्मा, फुगडी भोंडल्यासंगे
मंगळागौरीचाही खेळ आला

श्रावण आला श्रावण आला
मंदिरी भजनात जोश आला
आसमंती नवरंग हे उधळता
सुख, आनंदाला बहर आला

https://marathikavita.co.in/index.php?topic=60898.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २२ जुलै, २०२५

कल्पनेच्या तीरावर

कल्पनेच्या तीरावर

कित्येक स्मृतींचा ठेवा, कल्पनेच्या तीरावर 
तेव्हा मात्र मन नादान भिरभिरते वाऱ्यावर 

गोडी म्हणा, खोडी म्हणा, लागतोच चाळा 
इवला जीव हा मग राहतोय कुठे थाऱ्यावर 

डुबकी दर डुबकी आठवत राहते काहीतरी 
पुन्हा विसरते भान न् ताबा कसला मनावर

सगळे खोडकर पाणी ढग मन आणि वारा
आरोप प्रत्यारोप, कुणी, करायचा कुणावर 

विसरतो स्वतःला, डोकावता हळूहळू येथे
विरघळताना प्रतिबिंब हे पारदर्शी जळावर 

https://marathikavita.co.in/index.php?topic=60665.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १६ जुलै, २०२५

काही कळेना

काही कळेना

कचऱ्याच्या डब्याला सोन्याचा भाव
कोण म्हणतो? देश गरीब हाय राव?

स्वस्त घरांच म्हणतात होणार वाटप 
सामान्यांच्या हिताला कोण देई वाव!

"ज्याच्या हाती ससा, तो खरा पारधी"
व्यवस्थेवर घालतो तोच पहिला घाव

भ्रष्टाचार, गुन्ह्याच्या वाढत्या फेऱ्यात
होतयं पहा देशात राज्याचं मोठं नाव?

कुठे चाललोय आपण काही कळेना
स्वतःतच मश्गूल दिसतो जो तो राव!

https://marathikavita.co.in/index.php?topic=60133.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १४ जुलै, २०२५

आहे का वेळ


आहे का वेळ

वाटे आजही मनाला
हाताळावे रोज पुस्तकाला
काहीतरी गडबड होते
आणि राहून जाते वाचायला

कधी व्यवधाने रोजची
म्हणती पाहू मग पुस्तकाला
भुरळ सोशल मीडियाची
अन् मोबाईल आडवतो मला

सांगून गेले आहे कुणीतरी
घडवते ओळ एक आयुष्याला 
तुम्हा आम्हा कळतय सारं 
पण! आहे का वेळ वाचायला?

https://marathikavita.co.in/index.php?topic=59984.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १२ जुलै, २०२५

वीकेंडची सुट्टी

वीकेंडची सुट्टी

निसर्गाचे हे रूप वेगळे
पाहण्यास जातात काही बावळे
पर्वा न करता जीवाची
सेल्फी साठी करती कैक चाळे

मदिरापान अन् गोंगाट
सोबतीला असते हुल्लडबाजी
धाक न जुमानता काही
करतात हवं ते त्यांची मनमर्जी

निसर्गाचे रूप दाखवणे?
येथे, स्टेटस करता जो तो हट्टी
संवर्धन कसले निसर्गाचे
लेखी तयांच्या वीकेंडची सुट्टी

https://marathikavita.co.in/index.php?topic=59908.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, ६ जुलै, २०२५

तु विठ्ठला


तु विठ्ठला

काय सांगू दिसतोस, कुठे कुणा तु विठ्ठला
कष्टणाऱ्यांच्या हातातील कष्टात तु विठ्ठला

सावळ्या नभात तु, न् कोसळत्या धारेत तु 
मातीत तु,पिकात भरल्या शेतात तु विठ्ठला

कपाळी नामात तु, अबीर गुलाल रंगात तु 
वाऱ्यावर फडकणात्या, ध्वजात तु विठ्ठला

टाळात तु, मृदंगात तु, डोईवर तुळशीत तु 
वारीमध्ये चालणाऱ्यां, पावलात तु विठ्ठला

नाम्याच्या पायरीत तु राऊळी कळसात तु
फिरता मागे,भक्तांच्या डोळ्यात तु विठ्ठला

https://marathikavita.co.in/index.php?topic=59301.new#new


©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २४ जून, २०२५

निबर चौकट


निबर चौकट

अस्थिर राजकारणातील धाडसी विधान
"समाजात सर्वजण एकमेकांना लुटतात"
एकमेव नेते मंचावर सत्य मान्य करताना
शैक्षणिक धोरणांचे, सत्य उघड करतात !

एकीकडे त्रिभाषा सुत्राचा गोंधळ असता
पक्षीय मत मतांतरे का भरकटत जातात?
आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांचा
प्रत्यक्षात कोणते सुज्ञ नेते विचार करतात?

प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधणारे नेते
त्या संधीचं, केवळ राजकारणच करतात
अडचणीत पकडून समोरच्याला दरवेळी
निर्लज्जपणे आपली पोळी भाजून घेतात!

https://marathikavita.co.in/index.php?topic=58362.new#new


©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, ८ जून, २०२५

"उतराई" ओळख काव्यसंग्रहाची…

ओळख काव्यसंग्रहाची…उतराई
आस्वादक......लेखिका- वंदना ताम्हाणे, मुंबई

वारी म्हणजे महाराष्ट्राचा श्वास. संताचा सहवास. संत साहित्याने गर्भश्रीमंत केलं महाराष्ट्राला. अभंग, श्लोक, आरत्या, भजन यांच्या परिमळाने ही भूमी पावन झाली.
या परीस स्पर्शाने अफाट, अद्वितीय ग्रंथ संपदा निर्माण झाली. अध्यात्माचा हा वारसा आपल्याला लाभला हे भाग्यच आपलं. मानवता कणाकणात, चराचरात पाहण्याची दृष्टी मिळाली. सामान्य माणूस असो वा कलावंत, लेखक, कवी या सर्वांनाच भुरळ घातली संत साहित्याने. 

विशेष म्हणजे आजच्या काळातही हे धन टिकण्याचं एकमेव कारण आपल्याला लाभलेली गौरवशाली संत परंपरा. हे शब्दांचं वैभव, ऐश्वर्य पिढ्यानपिढ्या पोहोचत आहे अखंड..याचा अभिमान वाटतो. या भावनेतूनच साकारला गेला ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, गझलकार श्री. शिवाजी सांगळे यांचा ‘उतराई’ हा काव्यसंग्रह. त्यांच्याच हस्ते सजलेल्या साध्या सुंदर मुखपृष्ठासह. हे ऋण चुकते करता येणार नाही असं प्रांजळ मत कवी आपल्या मनोगतात व्यक्त करतात. मनातील नम्र भाव, देवाठायी असलेली श्रद्धा, भक्ती यातूनच वाणीवर विराजमान झाले शब्द व निर्माण झाल्या ऐंशी कविता. 

सन्माननीय लेखक, अभ्यासक विश्लेषक, कवी श्री. अनुपम श्रीधर बेहेरे यांची विश्लेषणात्मक प्रस्तावना काव्यसंग्रहाचा गाभा उलगडते. 

गणेश स्तवनाने काव्यसंग्रहाचा शुभारंभ होऊन कवितांचं दालन खुले होते. आदिमाया आदिशक्तीची अर्चना करुन या प्रकृतीरुपाला वंदन करताना ‘तूच जननी साऱ्यांची’ असा 'आदिमाया आदिशक्ती' कवितेत तिचा गौरवपूर्ण उल्लेख कवी प्रकृतीची शक्तीची उपासना करतो. तर ‘तुज दारी’ कवितेत ‘श्वास चाले कानी पडता किर्तन अभंग’ म्हणताना देहभान विसरून दंग होण्याच्या अवस्थेचं वर्णन म्हणजे भक्तीत समाधीस्थ होणंच.. आपल्या श्वासाला हे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. अभंग किर्तनाच्या संस्कारानेच आपण पोसलो. मनाचे पोषण झाले. याची प्रचितीच जणू. 

कुळाचार, कुळधर्म याचं महत्त्व स्पष्ट करताना कुळदैवत खंडेरायाला ‘देव मल्हारी’ कवितेत... 

यळकोट करु घोष चढताना पायरी, 
सगळेच उधळू वाटेने भंडारा सोनेरी 

अशी आराधना करतात तेव्हा जेजुरी गड सोन्याचा भासल्याशिवाय राहत नाही. 

युगानुयुगे अमरप्रीत असलेल्या राधाकृष्णाला समर्पित बामसूरी, साद बासरी, मन सावळे, धून मुरलीची, रंग श्रीरंग, चक्रपाणी या कविता मन मोहकच. बामसुरी असा मोहक शब्दप्रयोग करत बामसुरी कवितेत,
 
असो पावा, मुरली, वेणू अनेक नावे
मंत्रमुग्ध सुरात बोले बामसूरी कान्हा
 
सूर आळवत ही धून मुरलीची रसिकांच्या कानी पोहोचते.
 
वेडावते राधा अन् रानात 
शहारे कालिंदी जळावरी 

या ओळी राधेची उत्कट प्रीत दर्शवतात. 
भक्तीरसात न्हाऊन निघणाऱ्या या कविता देवत्वाच्या जवळ नेऊन हृदयात तृप्ततेचं समाधान देतात. नामाचं महत्त्व सांगणाऱ्या कविता समर्थांचा महिमा, स्वामी नाम व नाम या आताच्या कलियुगात नामाला किती महत्त्व आहे व साध्या, सोप्या भक्तीचं रुप प्रकट करतात. तर एकादश स्तोत्र कवितेत ‘स्तोत्र एकादश, गात मनोमनी विठ्ठल चरणी आपले भाव समर्पित’ करतात. 

महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीविठ्ठलाला हृदयी पाहत वारी, दिंडी, वारकरी, देवाचं दर्शन, ताटातूट झाल्याने भूक वैष्णवांची अवस्थेचं कळकळीने, तडफडीने व्यक्त करणारे शब्द मनाचा ठाव घेतात व 'रे सावळ्या' ला मागणं मागतात,
 
भेदभाव अंतरी जो नांदतो 
धर्म जात कलह सारा जळू दे 

आशयगर्भ, अर्थपूर्ण, जीवनाचं सखोल तत्त्वज्ञान नकळत पोहोचवताना आरत्या, अभंग, भजन, स्तोत्र,प्रार्थना या स्वरुपात समोर येऊन पंचतत्वाची पंचारतीच करतात या कविता जणू! 

नित्य कर्म, ध्यान, गुूढ अर्थ कवितेत मन:शांतीसाठी, धारणेसाठी, मोक्षाकडे वाटचाल करताना व अंती मोक्ष मिळण्यासाठीच सारी धडपड हे सार शब्दा शब्दात प्रकट होते. 
'जीवन वारी' कवितेत... 
 
माझा विठ्ठल माझी वारी.. चाले या संसारी
कर्मकांड विठ्ठल माझे… श्वासांची उसनवारी
 
माझं स्वत:चं असं काय आहे? श्वासही माझा नाही. तो ही उसनाच. माझे कर्म विठ्ठललाच अर्पण..तोच कर्ता करविता असे सुंदर लीन भाव येथे जाणवतात. 
तर 'रेघोट्यांचा देह' या अप्रतिम कवितेत जाणिवा अधिक सखोल होत जातात व या नश्वर देहाचं सत्य स्वरुप या काव्य पंक्ती अधोरेखित करतात,
 
निश्चल या मन डोहात हे तरंग कसले उठती
अज्ञात गूढ पाताळी कधी उंच नभात जाती
कुठवर आता सांभाळावा देह हा रेघोट्यांनी 
धूसर आकाश पक्षी अवघे जाळे विणून देती

मनाची चंचलता, मनाच्या डोहाची गूढता उकलता उकलत नाही धूसरतेचं आकाश व्यापक होत आपल्या मनाचा पक्षी जाळे विणतो व त्यातच आपलं गुरफटणं होतं...मनाची ही नेमकी अस्थिरता येथे प्रकट झाल्यानंतर... 

आपण का जगतो हा प्रश्न कवीला पडतो, या अज्ञात वाटेवर पावले जात असता काय हाती लागते, काय आहे आयुष्य याचा शोध घेत असता कवी अनोळखी होतो व म्हणतो,
 
अजूनही 'अनोळखी' का असा मी स्वत:ला
शोध संपेना जीवनी कसा ओळखू स्वत:ला 

प्रत्येकाचा हा शोध आत्मचिंतन करणारा. मनाचा वेध घेणारा. आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करणारा. 

हे स्पष्ट करताना 'प्राक्तन' कवितेत झाडावरुन धरणीच्या भेटी गेलेलं पान, एकाकी फांदी या सुंदर रुपकात कवीने सहज स्पष्ट केलंय. 

घेऊन अंगी शुष्क रेषा 
जाता पान धरा भेटीला
विरह वेदना त्या क्षणी 
छळे एकाकी फांदीला 

पण 'मनात दाटले' कवितेत व्यक्त होताना…
 
जन्म, वृद्धी, मोक्ष प्राक्तन वृक्ष दलाचे
कुजनी खगाच्या विरक्त भाव सुखाचे  

ही संन्यस्तता येथे जाणवते. जीवनाचे सत्य सांगताना मर्म सांगताना ‘वहिवाट’ या कवितेत.. 

काळाचीच रीत । व्यवहारी भ्रष्ट। 
अंती करी नष्ट। ध्यानी असो ।। 
कोण नित्य येथे। थांबावया आले। 
जाणे ठरलेले। माघारीचे।। 

जाणं हे अटळ अंतिम सत्य असलं तरी ही 'वहिवाट' सुरु असताना आपले कर्म निष्काम होऊन करावे. आपला कवीचा जन्म कामी यावा अशी भावना कवी व्यक्त करतो.
 
प्रयत्ने रहावे। उद्धाराया तमा।। 
येवो जन्म कामा । कवी जैसा।। 
अदृश्य रुपात। तारतो सर्वांस। 
अहर्निश श्वास । देतो प्राण ।। 

कवीच्याच शब्दात सांगायचं झाल्यास गोमातेच्या नेत्री जसा पान्हा तसं वात्सल्य व करुणा हृदयी जपावी. वृक्षाच्या ठायी जसा सेवा धर्म असतो तसेच आचरावे कर्म सर्वा प्रती असा दाखला कवी देतो. निसर्गाशी तादात्म्य पावून, चराचराप्रती समर्पण भाव अंतरात जागृत करत वसा घ्यावा समतेचा असं आवाहनच कवी 'वसा' या कवितेत करताना दिसतो.
 
संतानी जो दिला। समतेचा वसा ।। 
पाळे जो खासा । त्यासी कळे।। 

भक्तीचं अवडंबर पाहून मात्र कवी व्यथित होतो व भोंदूगिरी विरुद्ध खडे बोल सुनावतो. फटकारे मारतो. 'तथ्य' या कवितेत.. 

वठविती सोंग करीत भक्त गोळा 
घालुनी त्या माळा दंभी बुवा 
ऐशा भोंदू लोकां पाडोनी उघडे 
जाहीर वाभाडे काढावेत 

'दश द्वार दिशा' कविता मानव शरीराचं सत्य आरशाप्रमाणे सांगते.. 

दश द्वारांनी वेध घेई 
देह हा दश दिशांचा 
व्यतित करुनी आयुष्य
बोध न हो दिशांचा 

आयुष्य जातं पण मानवी देह दिशाहीन होत भटकत राहतो. बोधापासून कोसो दूर दूर तळमळत   अनेक व्याधींनी ग्रस्त होत जीवन व्यतीत करतो. 

पण यातून सहीसलामत सुटण्यासाठी, भवसागर सहज पार करुन जाण्यासाठी.. 

पाप पुण्य सारे, पुनर्जन्मा योग
सत्कर्माचा वेग वाढवावा
 
सत्कर्म हीच चावी या कुलूपबंद विकारी देहाची असे कवी आवर्जून सांगतो. 
या काव्यसंग्रहातील ‘वाटसरू’ ही कविता जीवाकडून शिवाकडे जाण्याचा प्रवास कथन करते. हा प्रवास सहजसाध्य व्हावा म्हणून ध्यानाचा मार्ग अवलंबयास सांगून  याच मार्गाने परमेश्वर प्राप्ती निश्चित होते व जन्म मृत्यू फेरा वाचतो... वाटसरूची वाट सरते ही खात्री या ओळी दर्शवतात. 
 
जीवाकडून शिवाकडे
भक्तीचा वारु, 
ध्यानाच्या प्रवासाचा 
तू वाटसरू 
जन्म मृत्यूच्या त्या 
फेऱ्या आडून 
शोध परमात्म्याचा 
आत्म्याकडून

पथदीप, सार्थ जीवन, मोह, माया, दंभ भाव या कविता मनुष्यातील विविध विकारी भावावर घाला करतात. 

या काव्यसंग्रहातील'भय दु:खांचे' ही कविता प्रतिभेचं लेणं म्हणावयास हरकत नाही… 

दु:खानो या, या परतुनी 
मजला नशा तुमची हवी
सोसले खूप ज्यांनी तुम्हा 
त्यांची जरा सुटका व्हावी
भोग तुमचे, माझे सारखे 
द्यायचे तुम्ही मी घ्यायचे 
सहन कराल कितीक काळ? 
जीवन माझे धुम्र वलयांचे 

शाश्वत अस्तित्व जरी असलं तरी तुम्हास मोक्ष नाही ही दु:खाची यथार्थता कवीच्या शब्दात येथे स्पष्ट होते.

‘जन्माची वारी’ या कवितेत ही जन्माची वारी व्यर्थ न जावो म्हणून सदैव सत्याची कास धरावी ही जणू प्रार्थनाच कवी आपल्या शब्दांनी करतो. स्वर व्यंजन, अक्षरकारक गणनायक व स्वामी समर्थांच्या आरतीने 'उतराई'ची काव्यसंग्रहाची सांगता होते पण मनात अध्यात्माच्या ज्योतीच्या जागृतीने. शब्दांचा हा नंदादीप तेवत राहतो व अंतरीचा गाभा उजळतो व चैतन्य तिथे कायमचे वास्तव्यास येते. निराकार असं सतभावनेचं रुप शब्दांतून साकार होते. भक्तगणांच्या मनात ठसा उमटवत, अबीर व बुक्क्याचा मंगल टिळा भाळी तेजाचं वलय उभं करत.

कवी आपल्या अनुभवसंपन्न समर्थ शब्दांनी आपले भाव सुबोध शैलीत रसिकजनांपुढे व्यक्त करता तर झालाच. पण भाषेचं समृद्धीकरण, ज्ञानाची परिपक्वता या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे हा काव्यसंग्रह दर्जेदार होऊन ऐहिक जग, ऐलतीर, पैलतीर, द्वैत अद्वैत भाव, लौकिक पारलौकिक अशा अनेक तत्वांना मूळाशी ठेवून अधिकाधिक परमात्म्याच्या जवळीकीची अनुभूती देणारा झाला. परमेश्वर आपल्या हातून अशा अनेकानेक कलाकृती घडवत राहो व रसिकमन तृप्त होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

भक्ती काव्यसंग्रह - उतराई 
कवी - श्री. शिवाजी सांगळे
प्रस्तावना - श्री. अनुपम श्रीधर बेहेरे
प्रकाशक - साईश इन्फोटेक ॲण्ड पब्लिकेशन्स, पुणे २६
मुखपृष्ठ - श्री. शिवाजी सांगळे
मूल्य - १५०/-

गुरुवार, ५ जून, २०२५

गुण तुझे गाण्यासाठी

गुण तुझे गाण्यासाठी

सृष्टी सारी आनंदाने न्हाऊन जावू दे रे
गुण तुझे गाण्यासाठी मनी भाव येवू दे रे ॥ध्रु॥

शित वारे सुटते आधी मेघ सावळे येता
प्रफुल्लित होती झाडे जाणीव तुझी होता
नयनरम्य दृश्य अवघे मला दिसू दे रे ॥१॥

डोईवर पडती आधी थेंब अमृताचे  
अनोखा सुर बोलती बोल त्या सरींचे
आस्वाद त्या सुरांचा मला घेऊ दे रे ॥२॥

मध्ये मध्ये स्तब्ध होता सुरेल गाणे
सुखावून देते ओल्या उन्हाचे अवचित येणे
खेळ उन पावसाचा मला पाहू दे रे ॥३॥

एका एका थेंबाने नदी बहरताना
ओहळ नाल्यां मधूनी आधी दौडताना
लुटू पुटूची शर्यत एकदा मला पाहू दे रे ॥४॥

https://marathikavita.co.in/index.php?topic=57414.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २ जून, २०२५

पानगळ ०२०६२०२५ yq ११:४३:५३

पानगळ

पानगळी सारखं
मन मोकळं झालं तर?
कदाचित दु:ख वाटेल 
काही काळ!
पण एक लक्षात येतं?
ते म्हणजे,
मन पुन्हा कोरं होईल!
नव्याने नाती बांधायला...
हळूवारपणे फुलायला,
जशी पालवी फुटते नव्याने,
काय वाटतं?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ३० मे, २०२५

ध्येय

ध्येय

तु एक मीही एक दोघं प्रवासी एका वाटेचे
माहीत नाही कुणाला गंतव्य कुठे कोणाचे

वाट सारी चाळलेली, तरी थोडी मळलेली
असून समांतर,तरी अंतर राहील कायमचे

लागलीच का थांबतो प्रवास खेळ इथला? 
हुशारीने दरवेळी आपले पाऊल टाकायचे

स्पर्धेच्या युगात नित्य रे अडथळे नियमांचे
पाळून अटी,शर्ती सर्व नेमके उत्तर द्यायचे

डाव प्रतीडाव खेळू दे, भले कुणी कितीही
तत्त्व प्रामाणिकतेचे, स्वतः नाही सोडायचे

म्हणो कुणी आहे कठीण वाटचाल इथली
लढून हिमतीने, तु ध्येय मनातले गाठायचे

https://marathikavita.co.in/index.php?topic=57119.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

बुधवार, २८ मे, २०२५

गावात बोंब झाली

गावात बोंब झाली

एकदा तिची नि माझी ठरवून भेट झाली
झाली उगा चर्चा,अन् गावात बोंब झाली || ध्रु ||

हाटेलाच्या भजींचा वाऱ्यावर गंध सुटला
पोटात भूकेचा, तेव्हा आगडोंब उठलेला
आमंत्रण देण्याची, संधी मला मिळाली || १ ||

बोलणे फार नाही इशाऱ्यात सर्व झाले
नास्ता करून पुरता बिलही देवून झाले
नको कुणी ओळखीचे पाहिले भोवताली || २ ||

सायकलवर चुकून तीचे दप्तर ठेवलेले
शेजारच्या कुणीतरी आम्हाला पाहिलेले
गावगप्पा करायची संधी त्याने न सोडली || ३ || 

https://marathikavita.co.in/index.php?topic=57008.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २६ मे, २०२५

अमृत २६०५२०२५ yq २१:०३:०५

अमृत

घेता दोन घोट जरासे, मेंदूला तजेला देतो
गंधाळून वाफाळल्या धमाल चर्चा घडवतो

थाटामाटात असतो कधी कुठे गुदमरलेला
खरा तर तो, कोपऱ्यावरील टपरीत भेटतो

काळ, वेळ, बंधनं ना त्या कशाचे लागलेले
रोजचा आहे तरी चारचौघात मजा आणतो 

उन्हाळा, पावसाळा वा ऋतू हिवाळा असो
तल्लफ भागवायला हा मात्र तत्पर असतो

ताण तणाव काहीही असो शिण घालवाया
आम्ही चहास या पृथ्वीवरले अमृत म्हणतो

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

पाऊस फील

पाऊस फील

कोसळला पाऊस येवढा तरी तो फील आला नाही
गढूळ पाण्यात नळाच्या, अजून गारवा मुरला नाही

वेडावतो माणूस जेव्हा, ऋतू त्याची नक्कल करतो
सावरुन जरी घेतो ऋतू, तरी माणूस बदलला नाही

वाहतील नदी नाले, येईलही पूर अताशा कुठे कुठे
तुंबणाऱ्या शहरांना सुद्धा अद्याप तो कळला नाही

कोडकौतुक खरे त्याचे, नित्य शेतात राबणाऱ्यांना
म्हणून मनाजोगा त्यांच्या पाऊस तो बरसला नाही 

बदलू लागलेत आडाखे, सारेच हल्ली असे येथले
कुठे,कधी,किती पडावे?अंदाज हा पावसाला नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=56923.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९